शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

शिवसेना मंत्र्यांचा रस्ता तुम्ही अडवून दाखवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण गावून झाल्यावर आता तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली का? शिवसेनेने ...

उस्मानाबाद : शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण गावून झाल्यावर आता तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली का? शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काय केले, ते विचारण्याची नैतिकताच उरली नाही. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांचे रस्ते अडवून दाखवाच, असे आव्हान आमदार कैलास पाटील यांनी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. भाजपचे केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध होत असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पत्रक काढून शिवसेनेवर आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हे जनतेला समजत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. शिवसेना काय करते अन् काय नाही याचा तुम्हाला चांगलाच अनुभव आहे शिवाय, हे मी तुम्हाला सांगतोय यासारखा तर योगच नसल्याचा टोला कैलास पाटील यांनी लगावला. शिवसेनेला हिशेब मागायची तुमच्यात व तुमच्या पक्षात नैतिकता उरली नाही. जेव्हा शिवसेनेने काय केले याचा हिशेब विचारता तेव्हा मागच्या ४० वर्षांच्या कारभाराचाही लेखाजोखा मांडावा. जिल्ह्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम शिवसेनेच्या फक्त दोन वर्षांच्या सत्तेत होत आहे, असा दावा करत कैलास पाटील यांनी यामुळेच विराेधकांना पोटशूळ उठल्याचे म्हटले आहे. कशावरही पत्रक काढून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा तुमचा हेतू कधीच सफल होणार याची जाणीव ठेवावी. मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा प्रयत्न करून दाखवावा, असे आव्हानही कैलास पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दिले.

विम्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू..

पीकविम्याच्या बाबतीत शिवसेनेने केंद्रात विमा कंपन्याचा करार रद्द करण्याची मागणी केली ती भाजप सरकारने नाकारली. भाजप सरकार व विमा कंपन्या यांचीच सेटलमेंट आहे. गेल्यावर्षी पीक विम्याच्या बाबतीत विमा कंपन्यांची मुजोरी उतरविण्यासाठी कायदेशीर मार्गाचा लढा शिवसेना देत आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केवीलवाणा असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.