शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

पिवळ्या सोन्याची झळाळी; मालामाल करेल की मृगजळ ठरेल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

मागच्या पाच वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत तालुक्याची सोयाबीनचे कोठार अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. खरिपाच्या एकूण ...

मागच्या पाच वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत तालुक्याची सोयाबीनचे कोठार अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. खरिपाच्या एकूण क्षेत्रात ८० टक्क्यांवर घेतल्या जाणाऱ्या या पिकाचा अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे. असे असले तरी हवामानाची अनुकूलता, रोगांचा प्रादुर्भाव, पेरणी ते काढणी दरम्यान लाभलेली वरुणराजाची साथ, बाजारभाव या सर्व बेभरवशाच्या स्थितीत पेरलं ते उगवेल का, उगवलेलं जगेल का, जगलेलं पदरात पडेल का अन् पदरी पडलेलं चांगल्या दरात विकेल का, याचा काही नेम नसतो. यंदा मात्र पेरणी ते काढणी या टप्यात प्रत्येकांच्या वावरात वेगवेगळे अनुभव असले तरी इकडे बाजारात मात्र मागच्या तीन महिन्यांत दरदिवशी दरात वृद्धी नोंदली गेली. आता हे पीक हाती येईल का? आले तर त्यास सध्याचा दर मिळेल का? की भरल्या बाजारात तो पुन्हा ‘बेभाव’ होणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

असा वाढला सोयाबीनचा पेरा

वर्ष पेरा (हेक्टर )

२०१७ ४८०००

२०१८ ५२०००

२०१९ ६३०००

२०२० ६५०००

२०२१ ६००००

बॉक्स १

झटपट अन् जास्त कालावधीचे सोयाबीन

ऐंशी ते नव्वद, नव्वद ते शंभर व शंभर ते ११० दिवस अशा झटपट, मध्यम व जास्त कालावधीत काढणीस येणारे सोयाबीन वाण याभागात घेतले जात असले तरी यास वाढ, फुलोरा व शेंगावस्थेत पूरक पाऊसपाणी समान गरजेचे असते अन् मिळणारा दर मात्र वेगवेगळा असतो. यंदा संपूर्ण हंगामात मात्र या दरात वृद्धी नोंदली आहे.

दरवृद्धी : पदरी पडेल की मृगजळ ठरेल

आगामी महिनाभर काढणी अन् मुख्य आवकीचा आहे. याकाळात आत्तापर्यंतचा ‘भाव’ आपल्यातील उठावातील स्थिरता कायम ठेवतो की ‘पिछे मुड’ असा पवित्रा घेतो याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे. काढणी हंगामाला निसर्गाची अन् काढणी झालेल्या मालाला बाजारातील दराची साथ मिळाली तरच शेतकरी मालामाल होणार आहे. नसता उभं पीक अन् दर दोन्ही शेतकऱ्यांसाठी मात्र मृगजळ ठरणार आहेत.

पिवळ्या सोन्याची झळाळी कायम राहिलं का?

सध्या झटपट येणाऱ्या व लवकर पेर झालेल्या सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. आगामी पंधरा दिवसांत उर्वरित फडास पक्वता येईल. यानंतरच्या पुढील पंधरवड्यात काढणीची लगबग सुरू होईल. यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आवक सुरू होईल. आवक वाढताच दर कमी होतो असा आजवरचा अनुभव आहे. यंदा हाच कित्ता गिरवला जातो की सातत्यपूर्ण होणारी दरवाढ शेतकऱ्यांना मालामाल करून जाते हे आगामी काळच ठरवणार आहे.