शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत याेजनेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय वविभागाच्या वतीने राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या घटकांसाठी साधारपणे २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण ...

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय वविभागाच्या वतीने राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या घटकांसाठी साधारपणे २०११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत याेजना सुरू करण्यात आली. इंदिरा आवास याेजना, रमाई आवास याेजना यापेक्षाही आगळी-वेगळी व भटक्या विमुक्तांचे जीवनमान उंचाविणारी अशी ही याेजना आहे. या याेजनेतून भटक्या विमुक्त घटकांतील कुटुंबास हक्काचे व पक्क्या घरकुलासाठी १ लाख २० हजार, राेहयाेचे १८ हजार आणि स्वच्छतागृहाचे १२ हजार असे एकूण १ लाख ५० हजार रूपये देण्यात येतात. सदरील याेजनेअंतर्गत २०१८-१९ मध्ये जिल्ह्याला सुमारे ३६७ घरकुले उभारणीचे उद्दिष्ट मिळाले हाेते. यापैकी २७८ घरकुले मंजूरही करण्यात आली. मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची कामे संंबंधित वर्षात पूर्ण करणे बंधनकारक हाेते. परंतु, प्रशासनातील उदासिनतेमुळे की काय, तीन वर्षानंतरही म्हणजेच २०२१ उजाडले तरी प्रशासनाला उद्दिष्टपूर्ती करता आलेली नाही. तीन वर्षांत केवळ ७४ घरकुले पूर्ण केली. म्हणजेच वर्षाकाठी २४ ते २५ घरकुले पूर्ण झाली आहेेत. त्यामुळे आजही थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल २०४ कुटुंबांचे पक्क्या घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेले नाही. यापैकी अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या कामाला सुरूवातही झालेली नाही. या सर्व प्रकारास प्रशासनाची कासवगती तर जबाबदार नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

चाैकट...

चार तालुक्यांतून प्रस्तावच नाहीत...

जिल्ह्यातील केवळ चारच तालुक्यांतून घरकुलासाठीचे प्रस्ताव आले आहेत. उर्वरित वाशी, कळंब, परंडा आणि लाेहारा तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही . त्यामुळे संबंधित तालुक्यांत विमुक्त जाती, भटक्या जमाती घटकांतील कुटुंबे नाहीत काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

ग्राफ तयार करा...

दृष्टिक्षेपात पूर्ण घरकुले...

तालुका मंजूर प्रस्ताव पूर्ण घरकुले

भूम १०५ २५

उमरगा ०२ ००.००

उस्मानाबाद ७८ २८

तुळजापूर ९३ १९

काेणाला किती उद्दिष्ट?

भूम तालुक्यासाठी १४३, उमरगा दाेन, उस्मानाबाद ८९ तर तुळजापूर तालुक्यासाठी १३३ घरकुलांच्या उभारणीचे उद्दिष्ट २०१८-१९ मध्ये दिले हाेते. यापैकी २७८ घरकुलांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली असता, आजवर केवळ ७४ घरकुले पूर्ण झाली आहेत. त्यामुळे २०४ कुुटुबांना आजही पक्क्या घरांची प्रतीक्षा आहे.

अनेकांच्या नावात तफावत?

जिल्हास्तरीय यंत्रणेकडून घरकुलाचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अनेकांच्या नावात बदल असल्याने त्यांना लाभ देताना अडचणी येत आहेत. अशी कामे अजेंड्यावर घेऊन तातडीने मार्गी लावणेे गरजेचे आहे. असे प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाचे येथील सहाय्यक आयुक्तांकडे पाठविले. यासही तीन महिन्यांचा कालावधी लाेटला आहे. तरीही या अनुषंगाने बैठक झालेली नाही, हे विशेष.