शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंडरपास पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST

येणेगूर : महामार्ग न ओलांडता अंडरपास पुलाचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी सोलापूर टोल प्लाझाच्या वतीने येथे पुलाचे बांधकाम हाती ...

येणेगूर : महामार्ग न ओलांडता अंडरपास पुलाचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी सोलापूर टोल प्लाझाच्या वतीने येथे पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून हे काम अर्धवट स्थितीत रखडल्याचे चित्र आहे.

पुणे-हैद्राबाद जोडणाऱ्या या मार्ग क्रमांक ९ चे चौपदरीकरणात ६५ क्रमांकाने नामकरण झाले. सध्या राष्ट्रीय महामार्ग निगमच्या सोलापूर कार्यालयाकडून सोलापूर-सस्तापूर-बंगला या कर्नाटक सीमेपर्यंतची देखरेख केली जाते. या महामार्गाच्या चौपदरी करणातील १०१ कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी दोन्ही बाजूच्या जमिनीचे २०११ पासून अधिग्रहण करण्यात आले. याला आता तब्बल १० वर्षे उलटली तरी काम अद्यापही पूर्ण झाले नाही.

गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उड्डाण पूल व अंडरपास पुलाचे नियोजन करण्यात आले. परंतु, एकही ऊड्डाणपूल व अंडर पास पुलाचे काम देखील अद्याप पूर्ण नाही. या महामार्गाच्या कामाच्या नंतर सुरू झालेले तुळजापूर-लातूर रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले. परंतु, ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हे काम अद्यापही प्रगतिपथावरच आहे.

विशेष म्हणजे येणेगूर गावच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये दक्षिणेकडील रस्त्याचा वापर होत असून, उत्तरेकडील सर्व्हिस रोडवर नागरिकांनी, व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जुन्या खड्ड्याच्या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. शिवाय, अंडरपास पुलाच्या केवळ दक्षिणेकडील भागाचे बांधकाम झाले असून, तर उत्तरेकडील कामाचा अद्याप श्रीगणेशाही झाला नाही. वरिष्ठ कार्यालयाने या अंडरपास पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.