शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

रेशन दुकानदाराकडून लाच घेताना महिला नायब तहसीलदार जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:27 IST

Woman Deputy Tehsildar caught taking bribe कोरोनाच्या कालावधीत गरजूंना रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वाटप करण्यात आले होते. हे धान्य वाटप केल्याने दुकानदारांना प्रतिक्विंटल १५० रुपयांप्रमाणे शासनाकडून बिल दिले जात आहे.

ठळक मुद्देरेशन दुकानदाराला बिल काढून देण्यासाठी घेतले १५ टक्के

उस्मानाबाद : कोरोना काळात मोफत धान्य वाटप केल्याने त्याचा मोबदला म्हणून शासनाकडून रेशन दुकानदारांना आलेली रक्कम काढून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या कळंब येथील महिला नायब तहसीलदाराला सोमवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. सोबतच दोन मध्यस्थी करणाऱ्या दुकानदारांनाही ताब्यात घेण्यात आले.

कोरोनाच्या कालावधीत गरजूंना रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वाटप करण्यात आले होते. हे धान्य वाटप केल्याने दुकानदारांना प्रतिक्विंटल १५० रुपयांप्रमाणे शासनाकडून बिल दिले जात आहे. कळंब तालुक्यातील एका रेशन दुकानदाराला तीन महिन्याचे ४४ हजार ६२३ रुपये बिल शासनाने मंजूर केले. हे बिल देण्यासाठी कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन उमर दराज खान पठाण (४७) यांनी बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ६ हजार ६९३ रुपयांची मागणी केली होती. यासाठी रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे (६४, रा. कोथळा) व रेशन दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे (रा. पाथर्डी) यांनी मध्यस्थी सुरु केली होती.

दरम्यान, हा सगळा प्रकार तक्रारदार दुकानदाराने लाचलुचपत विभागाचे अधीक्षक प्रशांत संपते यांच्याकडे कथन करत तक्रार दिली. यानंतर संपते यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी तक्रारीची शहानिशा करुन सोमवारी दुपारी कर्मचारी इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य, अर्जुन मारकड, सिद्धेश्वर तावसकर व दत्तात्रय करडे यांच्या सहाय्याने सापळा रचला. यावेळी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ६ हजार ७०० रुपयांची लाच देताच या पथकाने लाचखोरांना रंगेहात ताब्यात घेतले. लाचलुचपत विभागाने तिघांनाही ताब्यात घेऊन याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागOsmanabadउस्मानाबाद