शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

मागास आयोगासाठी १६ महिने का लागले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे शैक्षणिक व नोकरीमधील आरक्षण संपुष्टात येण्यास महाविकास आघाडी सरकारच ...

उस्मानाबाद : राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे शैक्षणिक व नोकरीमधील आरक्षण संपुष्टात येण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. १६ महिन्यांत मागास आयोग स्थापन न केल्याने ओबीसी समाजावर ही वेळ आल्याचा आरोप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केला असून, आरक्षणाच्या अनुषंगाने शुक्रवारी भाजप प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आ. पाटील म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने अजिबात गांभीर्य दाखविले नाही. न्यायालयात सुनावणी सुरू असताना १५ महिन्यांमध्ये किमान आठ वेळा सरकारने केवळ तारखा वाढवून मागितल्या. राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन करून इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षण का व किती असावे, याचे स्पष्टीकरण न्यायालयात सादर केले नाही. आता केंद्र सरकारने जनगणनेची माहिती पुरविली नाही, असे राज्यातील मंत्री कांगावा करीत आहेत. राजकीय आरक्षणासाठी या माहितीची आवश्यकता नाही. तसेच २०११ साली यूपीए सरकारच्या माध्यमातून झालेल्या जनगणनेत त्रुटी असल्याने तत्कालीन काँग्रेस शासित केंद्र सरकारने ही माहिती प्रकाशित केली नाही. आता राज्य शासनाने १६ महिन्यांनंतर स्थापन केलेल्या राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करून अहवाल देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची गरज आहे. तरच केवळ महाराष्ट्रात रद्द झालेले हे राजकीय आरक्षण पूर्ववत होऊ शकेल, असेही आ. पाटील म्हणाले.

राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्णपणे संपुष्टात आले आहे. या निषेधार्थ व आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, या मागण्यांसाठी २६ जूनला सकाळी १० वाजता भाजप येडशी टोलनाका, तामलवाडी टोलनाका येथे व इतर सहा तालुक्यांच्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.