शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मागास आयोगासाठी १६ महिने का लागले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे शैक्षणिक व नोकरीमधील आरक्षण संपुष्टात येण्यास महाविकास आघाडी सरकारच ...

उस्मानाबाद : राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे शैक्षणिक व नोकरीमधील आरक्षण संपुष्टात येण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. १६ महिन्यांत मागास आयोग स्थापन न केल्याने ओबीसी समाजावर ही वेळ आल्याचा आरोप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केला असून, आरक्षणाच्या अनुषंगाने शुक्रवारी भाजप प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आ. पाटील म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने अजिबात गांभीर्य दाखविले नाही. न्यायालयात सुनावणी सुरू असताना १५ महिन्यांमध्ये किमान आठ वेळा सरकारने केवळ तारखा वाढवून मागितल्या. राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन करून इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षण का व किती असावे, याचे स्पष्टीकरण न्यायालयात सादर केले नाही. आता केंद्र सरकारने जनगणनेची माहिती पुरविली नाही, असे राज्यातील मंत्री कांगावा करीत आहेत. राजकीय आरक्षणासाठी या माहितीची आवश्यकता नाही. तसेच २०११ साली यूपीए सरकारच्या माध्यमातून झालेल्या जनगणनेत त्रुटी असल्याने तत्कालीन काँग्रेस शासित केंद्र सरकारने ही माहिती प्रकाशित केली नाही. आता राज्य शासनाने १६ महिन्यांनंतर स्थापन केलेल्या राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करून अहवाल देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची गरज आहे. तरच केवळ महाराष्ट्रात रद्द झालेले हे राजकीय आरक्षण पूर्ववत होऊ शकेल, असेही आ. पाटील म्हणाले.

राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्णपणे संपुष्टात आले आहे. या निषेधार्थ व आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, या मागण्यांसाठी २६ जूनला सकाळी १० वाजता भाजप येडशी टोलनाका, तामलवाडी टोलनाका येथे व इतर सहा तालुक्यांच्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.