शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

आम्ही कोणाची कळ काढत नाही, काढली तर त्यांना महाराष्ट्र सोडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:06 IST

शरद पवारांचा मोदींवर पलटवार

उमरगा (जि. उस्मानाबाद) : आम्ही कोणाची कळ काढत नाही अन् काढली तर त्यांना महाराष्ट्र सोडत नाही, असा सज्जड इशारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उमरगा येथे शरद पवार यांची सभा झाली. यावेळी ते म्हणाले, मोदी यांना पाच वर्षांत काय केले हे सांगता येत नाही. त्यामुळे ते कुटुंबावर बोलतात. गांधी-नेहरू घराण्याला शिव्या घालतात. 

७० वर्षांत काहीच झाले नाही म्हणतात, कारण त्यांना इतिहास आठवत नाही. काँग्रेसने आणि या देशातील जनतेने सैन्य दलाचा नेहमी सन्मान केला आहे. परंतु, त्याचा राजकीय फायदा कोणी उचलला नाही. मात्र देशात पहिल्यांदाच सैन्याचा राजकीय लाभ घेतला जात आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील वायूदल अधिकारी अभिनंदन यांना सोडविले की, यांची छाती ५६ इंचाची होते. मग तीन वर्षांपासून एक सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगात आहे, मग त्यावेळी यांची छाती का १५ इंचाची झाली. 

मोदींनी ५५ महिन्यांत ९२ विदेश दौरे केले. देशात १ रुपया आणला नाही. नवीन उद्योग नाही. बेरोजगारी वाढली. त्यावर न बोलता धर्मांध भावना निर्माण करणारे विधान त्यांच्याकडून होते हे दुर्दैव आहे. भाजपचे नेते शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना ‘लावारीस’ म्हणतात. देशातील सैन्याला ४० अतिरेकी मारले म्हणतात, असल्या नेत्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही पवार यांनी केला.

यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसने सैन्य दलाचा नेहमी सन्मान केला आहे. परंतु, त्याचा राजकीय फायदा कोणी उचलला नाही. मात्र  पाकिस्तानच्या ताब्यातील वायू दल अधिकारी अभिनंदन यांना सोडविले की, यांची छाती ५६ इंचाची होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019osmanabad-pcउस्मानाबादSharad Pawarशरद पवार