शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसून विकावा लागताेय भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी ...

तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी चक्क घाण पाण्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करावा लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील भाजी मंडईत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी, व्यापारी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी करतात. मात्र ही भाजी मंडई विविध समस्यांनी ग्रासली आहे. नागरिकांना विशेषतः महिलांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. भाजी मंडईत मोठी समस्या म्हणजे भाजी विक्रेत्यांना ओट्याची सुविधा नाही. तसेच अंतर्गत रस्त्यांचाही पत्ता नाही. परिणामी पावसाळ्यात चिखलातूनच मार्ग काढत भाजीपाला खरेदी, विक्री करावा लागतो.

दरम्यान, भाजी मंडईत जागेअभावी शेतकरी मंडईच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसूनच भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकही टाकाऊ पदार्थ हे भाजी मंडईच्या लगतच टाकत असल्याने दुर्गंधीत जास्तीची भर पडत आहे. ही बाब पालिका प्रशासन गांभीर्याने घेणार कधी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

चाैकट...

तुळजापूर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे, त्या कंपनीच्या ठेकेदाराचा कामचुकारपणा तुळजापूरकरांच्या जिवावर उठला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. असे असताना देखील पालिका प्रशासन ठेकेदाराकडून तुळजापूर शहराची साफसफाई करून घेत नाही. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याची जबाबदारी तुळजापूर पालिका प्रशासन आणि ठेकेदारावर असून, पालिकेने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रतिक्रिया..

भाजी मंडईमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. शहर स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीवर ठेका दिला असून त्याच्याकडूनही स्वच्छता केली जात नाही. तसेच जवळचे हॉटेल व्यावसायिक उरलेले शिळे अन्न येथे आणून टाकतात. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. परिणामी नागरिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे आराेग्य धाेक्यात आहे.

- अविनाश पवार, सामाजिक कार्यकर्ते.

भाजी मंडईत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. महिन्याला १५ लाख रुपयांचे बिल स्वच्छता विभागाकडून संबंधित ठेकेदार स्वच्छतेच्या नावाखाली उचलतो. मात्र स्वच्छता कुठेही केलेली दिसत नाही. त्या पैशाचा योग्य उपयोग होत नाही. कचरा विलगीकरण करून प्रक्रिया करण्याचे मुद्दे स्वच्छतेच्या टेंडरमध्ये असतानाही संबंधित एजन्सीने कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही.

- राहुल खपले, नगरसेवक, तुळजापूर.