शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसून विकावा लागताेय भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी ...

तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी चक्क घाण पाण्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करावा लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील भाजी मंडईत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी, व्यापारी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी करतात. मात्र ही भाजी मंडई विविध समस्यांनी ग्रासली आहे. नागरिकांना विशेषतः महिलांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. भाजी मंडईत मोठी समस्या म्हणजे भाजी विक्रेत्यांना ओट्याची सुविधा नाही. तसेच अंतर्गत रस्त्यांचाही पत्ता नाही. परिणामी पावसाळ्यात चिखलातूनच मार्ग काढत भाजीपाला खरेदी, विक्री करावा लागतो.

दरम्यान, भाजी मंडईत जागेअभावी शेतकरी मंडईच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसूनच भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकही टाकाऊ पदार्थ हे भाजी मंडईच्या लगतच टाकत असल्याने दुर्गंधीत जास्तीची भर पडत आहे. ही बाब पालिका प्रशासन गांभीर्याने घेणार कधी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

चाैकट...

तुळजापूर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे, त्या कंपनीच्या ठेकेदाराचा कामचुकारपणा तुळजापूरकरांच्या जिवावर उठला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. असे असताना देखील पालिका प्रशासन ठेकेदाराकडून तुळजापूर शहराची साफसफाई करून घेत नाही. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याची जबाबदारी तुळजापूर पालिका प्रशासन आणि ठेकेदारावर असून, पालिकेने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रतिक्रिया..

भाजी मंडईमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. शहर स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीवर ठेका दिला असून त्याच्याकडूनही स्वच्छता केली जात नाही. तसेच जवळचे हॉटेल व्यावसायिक उरलेले शिळे अन्न येथे आणून टाकतात. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. परिणामी नागरिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे आराेग्य धाेक्यात आहे.

- अविनाश पवार, सामाजिक कार्यकर्ते.

भाजी मंडईत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. महिन्याला १५ लाख रुपयांचे बिल स्वच्छता विभागाकडून संबंधित ठेकेदार स्वच्छतेच्या नावाखाली उचलतो. मात्र स्वच्छता कुठेही केलेली दिसत नाही. त्या पैशाचा योग्य उपयोग होत नाही. कचरा विलगीकरण करून प्रक्रिया करण्याचे मुद्दे स्वच्छतेच्या टेंडरमध्ये असतानाही संबंधित एजन्सीने कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही.

- राहुल खपले, नगरसेवक, तुळजापूर.