शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसून विकावा लागताेय भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी ...

तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी चक्क घाण पाण्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करावा लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील भाजी मंडईत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी, व्यापारी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी करतात. मात्र ही भाजी मंडई विविध समस्यांनी ग्रासली आहे. नागरिकांना विशेषतः महिलांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. भाजी मंडईत मोठी समस्या म्हणजे भाजी विक्रेत्यांना ओट्याची सुविधा नाही. तसेच अंतर्गत रस्त्यांचाही पत्ता नाही. परिणामी पावसाळ्यात चिखलातूनच मार्ग काढत भाजीपाला खरेदी, विक्री करावा लागतो.

दरम्यान, भाजी मंडईत जागेअभावी शेतकरी मंडईच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसूनच भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकही टाकाऊ पदार्थ हे भाजी मंडईच्या लगतच टाकत असल्याने दुर्गंधीत जास्तीची भर पडत आहे. ही बाब पालिका प्रशासन गांभीर्याने घेणार कधी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

चाैकट...

तुळजापूर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे, त्या कंपनीच्या ठेकेदाराचा कामचुकारपणा तुळजापूरकरांच्या जिवावर उठला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. असे असताना देखील पालिका प्रशासन ठेकेदाराकडून तुळजापूर शहराची साफसफाई करून घेत नाही. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याची जबाबदारी तुळजापूर पालिका प्रशासन आणि ठेकेदारावर असून, पालिकेने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रतिक्रिया..

भाजी मंडईमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. शहर स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीवर ठेका दिला असून त्याच्याकडूनही स्वच्छता केली जात नाही. तसेच जवळचे हॉटेल व्यावसायिक उरलेले शिळे अन्न येथे आणून टाकतात. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. परिणामी नागरिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे आराेग्य धाेक्यात आहे.

- अविनाश पवार, सामाजिक कार्यकर्ते.

भाजी मंडईत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. महिन्याला १५ लाख रुपयांचे बिल स्वच्छता विभागाकडून संबंधित ठेकेदार स्वच्छतेच्या नावाखाली उचलतो. मात्र स्वच्छता कुठेही केलेली दिसत नाही. त्या पैशाचा योग्य उपयोग होत नाही. कचरा विलगीकरण करून प्रक्रिया करण्याचे मुद्दे स्वच्छतेच्या टेंडरमध्ये असतानाही संबंधित एजन्सीने कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही.

- राहुल खपले, नगरसेवक, तुळजापूर.