शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले...
2
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या, २४ तासात दुसरी घटना
4
मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी
5
'या' कोट्यधीश युट्यूबरवर ईडीची कारवाई; जप्त केली बीएमडब्ल्यू-डिफेंडर कार, अनेक ठिकाणी छापे
6
"अक्षय खन्ना सेटवरही रहमान डकैतसारखं वागायचे..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा मोठा खुलासा; रणवीरबद्दल काय म्हणाला?
7
काराकासमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनावर ड्रोन हल्ला; ४५ मिनिटे तुफान गोळीबार, व्हेनेझुएला पुन्हा एकदा हादरले!
8
कोडिंग करणाऱ्या एआयची पहिली कंपनी बुडाली; फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; 'AI फ्रॉड' नाही तर 'हे' होते मुख्य कारण
9
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
10
इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
12
ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण
13
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
14
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
15
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
16
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
17
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
18
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
19
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
20
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या काळाच्या ओघात हाेताहेत दुर्मीळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा ...

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा जपण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यात शेत शिवारातील बांधाकुंदावर, उभ्या पिकांत तसेच जंगलात विविध भाज्या, वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात. रानभाज्या म्हणून संबोधला जाणारा हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. शरीराच्या नानाविध तक्रारींवर गुणकारी ‘मात्रा’ म्हणून या चविष्ट व आरोग्यदायी रानभाज्या कामी येतात.

या रानभाज्या आपणास ठाऊक आहेत का?

पाथरी

पाल्याच्या स्वरूपात भरपूर प्रथिने व जीवनसत्वे असलेली पाथरीची भाजी गुणाने शीतल, रेचक आहे. याचे सेवन अपचन, त्वचारोग, कंबरदुखी, कावीळ, यकृत यासाठी फायदेशीर आहे.

तांदुळजा

शेतातील बारमाही तण असलेली तांदुळजा किंवा तांदुळकुंज्रा ही सहज उपलब्ध होणारी रानभाजी आहे. याच्या कोवळ्या पानाची भाजी मधुर असून उष्णता, ताप, पोटविकार व दाह यासाठी गुणकारी आहे.

घोळ

याच्या पान, देठाच्या भाजीचा स्वाद जितका खमंग तितकीच ती जीवनसत्व, लोह, तांब, क्षार, तंतूमय असलेली भाजी. यामुळे कर्करोग, रक्तदाब, लकवा, यकृतासाठी फायदेशीर असते.

अंबाडी

पानाच्या स्वरूपात कांद्यासोबत आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी चवीस आंबटगोड अशीच. रोगप्रतिकारशक्तीवर्धक अंबाडीत लोह, जीवनसत्व अ आणि क, फोलेट, झिंक असे अँटी ऑक्सिडंट असतात.

चंदन बटवा

चंदन बटवा ही एक पानाच्या स्वरूपात उपलब्ध होणारी प्रमुख रानभाजी आहे. कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर असलेली ही भाजी अपचन, बद्धकोष्ठता यासाठी गुणकारी आहे.

या रानभाज्या झाल्या गायब...

तरवटाची भाजी विस्मृतीत

या भागात तरवट म्हणून आढळणारी भाजी आता दुर्मीळ झाली आहे. भुईमूग, मेथीसारखी पाने व लहान पिवळी फुले असलेली ही भाजी संधीवात, स्नायुदुखी अशा विविध आजारांसाठी बहुगुणी आहे. अशी हा रानभाजीची आता केवळ आठवण राहिली आहे.

चिलाची चव कुठे चाखावी?

ग्रामीण भागातील चिलाची भाजी काळाच्या ओघात लुप्त झाली आहे. वात, पित्त व कफ या त्रिदोषाला शांत करणारी ही पालेभाजी पाहावयास मिळत नाही.

तज्ज्ञाचा कोट

शक्तिवर्धक रानभाज्या

शेत शिवारात निसर्गतः येणाऱ्या रानभाज्या या आरोग्यदायी असतात. त्यांच्या उपलब्धतेसाठी ना बियाण्यांची, खतांची गरज असते ना मशागतीची. आपोआप येणाऱ्या या भाज्या चविष्ट तर असतात शिवाय खनिजांची पूर्तता करणाऱ्या असतात. तंतूमय असल्याने अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात. यातील प्रत्येक भाजीचे स्वतंत्र औषधी गुणधर्म असल्याने चयापचय क्रिया सुरळीत होते.