शहरं
Join us  
Trending Stories
1
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
2
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
3
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
4
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
5
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
6
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
7
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
8
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
9
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
10
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
11
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
12
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
13
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
14
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
15
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
16
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
17
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
18
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
19
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
20
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास

रानभाज्या काळाच्या ओघात हाेताहेत दुर्मीळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा ...

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा जपण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यात शेत शिवारातील बांधाकुंदावर, उभ्या पिकांत तसेच जंगलात विविध भाज्या, वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात. रानभाज्या म्हणून संबोधला जाणारा हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. शरीराच्या नानाविध तक्रारींवर गुणकारी ‘मात्रा’ म्हणून या चविष्ट व आरोग्यदायी रानभाज्या कामी येतात.

या रानभाज्या आपणास ठाऊक आहेत का?

पाथरी

पाल्याच्या स्वरूपात भरपूर प्रथिने व जीवनसत्वे असलेली पाथरीची भाजी गुणाने शीतल, रेचक आहे. याचे सेवन अपचन, त्वचारोग, कंबरदुखी, कावीळ, यकृत यासाठी फायदेशीर आहे.

तांदुळजा

शेतातील बारमाही तण असलेली तांदुळजा किंवा तांदुळकुंज्रा ही सहज उपलब्ध होणारी रानभाजी आहे. याच्या कोवळ्या पानाची भाजी मधुर असून उष्णता, ताप, पोटविकार व दाह यासाठी गुणकारी आहे.

घोळ

याच्या पान, देठाच्या भाजीचा स्वाद जितका खमंग तितकीच ती जीवनसत्व, लोह, तांब, क्षार, तंतूमय असलेली भाजी. यामुळे कर्करोग, रक्तदाब, लकवा, यकृतासाठी फायदेशीर असते.

अंबाडी

पानाच्या स्वरूपात कांद्यासोबत आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी चवीस आंबटगोड अशीच. रोगप्रतिकारशक्तीवर्धक अंबाडीत लोह, जीवनसत्व अ आणि क, फोलेट, झिंक असे अँटी ऑक्सिडंट असतात.

चंदन बटवा

चंदन बटवा ही एक पानाच्या स्वरूपात उपलब्ध होणारी प्रमुख रानभाजी आहे. कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर असलेली ही भाजी अपचन, बद्धकोष्ठता यासाठी गुणकारी आहे.

या रानभाज्या झाल्या गायब...

तरवटाची भाजी विस्मृतीत

या भागात तरवट म्हणून आढळणारी भाजी आता दुर्मीळ झाली आहे. भुईमूग, मेथीसारखी पाने व लहान पिवळी फुले असलेली ही भाजी संधीवात, स्नायुदुखी अशा विविध आजारांसाठी बहुगुणी आहे. अशी हा रानभाजीची आता केवळ आठवण राहिली आहे.

चिलाची चव कुठे चाखावी?

ग्रामीण भागातील चिलाची भाजी काळाच्या ओघात लुप्त झाली आहे. वात, पित्त व कफ या त्रिदोषाला शांत करणारी ही पालेभाजी पाहावयास मिळत नाही.

तज्ज्ञाचा कोट

शक्तिवर्धक रानभाज्या

शेत शिवारात निसर्गतः येणाऱ्या रानभाज्या या आरोग्यदायी असतात. त्यांच्या उपलब्धतेसाठी ना बियाण्यांची, खतांची गरज असते ना मशागतीची. आपोआप येणाऱ्या या भाज्या चविष्ट तर असतात शिवाय खनिजांची पूर्तता करणाऱ्या असतात. तंतूमय असल्याने अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात. यातील प्रत्येक भाजीचे स्वतंत्र औषधी गुणधर्म असल्याने चयापचय क्रिया सुरळीत होते.