शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रानभाज्या काळाच्या ओघात हाेताहेत दुर्मीळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा ...

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा जपण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यात शेत शिवारातील बांधाकुंदावर, उभ्या पिकांत तसेच जंगलात विविध भाज्या, वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात. रानभाज्या म्हणून संबोधला जाणारा हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. शरीराच्या नानाविध तक्रारींवर गुणकारी ‘मात्रा’ म्हणून या चविष्ट व आरोग्यदायी रानभाज्या कामी येतात.

या रानभाज्या आपणास ठाऊक आहेत का?

पाथरी

पाल्याच्या स्वरूपात भरपूर प्रथिने व जीवनसत्वे असलेली पाथरीची भाजी गुणाने शीतल, रेचक आहे. याचे सेवन अपचन, त्वचारोग, कंबरदुखी, कावीळ, यकृत यासाठी फायदेशीर आहे.

तांदुळजा

शेतातील बारमाही तण असलेली तांदुळजा किंवा तांदुळकुंज्रा ही सहज उपलब्ध होणारी रानभाजी आहे. याच्या कोवळ्या पानाची भाजी मधुर असून उष्णता, ताप, पोटविकार व दाह यासाठी गुणकारी आहे.

घोळ

याच्या पान, देठाच्या भाजीचा स्वाद जितका खमंग तितकीच ती जीवनसत्व, लोह, तांब, क्षार, तंतूमय असलेली भाजी. यामुळे कर्करोग, रक्तदाब, लकवा, यकृतासाठी फायदेशीर असते.

अंबाडी

पानाच्या स्वरूपात कांद्यासोबत आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी चवीस आंबटगोड अशीच. रोगप्रतिकारशक्तीवर्धक अंबाडीत लोह, जीवनसत्व अ आणि क, फोलेट, झिंक असे अँटी ऑक्सिडंट असतात.

चंदन बटवा

चंदन बटवा ही एक पानाच्या स्वरूपात उपलब्ध होणारी प्रमुख रानभाजी आहे. कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर असलेली ही भाजी अपचन, बद्धकोष्ठता यासाठी गुणकारी आहे.

या रानभाज्या झाल्या गायब...

तरवटाची भाजी विस्मृतीत

या भागात तरवट म्हणून आढळणारी भाजी आता दुर्मीळ झाली आहे. भुईमूग, मेथीसारखी पाने व लहान पिवळी फुले असलेली ही भाजी संधीवात, स्नायुदुखी अशा विविध आजारांसाठी बहुगुणी आहे. अशी हा रानभाजीची आता केवळ आठवण राहिली आहे.

चिलाची चव कुठे चाखावी?

ग्रामीण भागातील चिलाची भाजी काळाच्या ओघात लुप्त झाली आहे. वात, पित्त व कफ या त्रिदोषाला शांत करणारी ही पालेभाजी पाहावयास मिळत नाही.

तज्ज्ञाचा कोट

शक्तिवर्धक रानभाज्या

शेत शिवारात निसर्गतः येणाऱ्या रानभाज्या या आरोग्यदायी असतात. त्यांच्या उपलब्धतेसाठी ना बियाण्यांची, खतांची गरज असते ना मशागतीची. आपोआप येणाऱ्या या भाज्या चविष्ट तर असतात शिवाय खनिजांची पूर्तता करणाऱ्या असतात. तंतूमय असल्याने अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात. यातील प्रत्येक भाजीचे स्वतंत्र औषधी गुणधर्म असल्याने चयापचय क्रिया सुरळीत होते.