शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रानभाज्या काळाच्या ओघात हाेताहेत दुर्मीळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा ...

कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा जपण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यात शेत शिवारातील बांधाकुंदावर, उभ्या पिकांत तसेच जंगलात विविध भाज्या, वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात. रानभाज्या म्हणून संबोधला जाणारा हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. शरीराच्या नानाविध तक्रारींवर गुणकारी ‘मात्रा’ म्हणून या चविष्ट व आरोग्यदायी रानभाज्या कामी येतात.

या रानभाज्या आपणास ठाऊक आहेत का?

पाथरी

पाल्याच्या स्वरूपात भरपूर प्रथिने व जीवनसत्वे असलेली पाथरीची भाजी गुणाने शीतल, रेचक आहे. याचे सेवन अपचन, त्वचारोग, कंबरदुखी, कावीळ, यकृत यासाठी फायदेशीर आहे.

तांदुळजा

शेतातील बारमाही तण असलेली तांदुळजा किंवा तांदुळकुंज्रा ही सहज उपलब्ध होणारी रानभाजी आहे. याच्या कोवळ्या पानाची भाजी मधुर असून उष्णता, ताप, पोटविकार व दाह यासाठी गुणकारी आहे.

घोळ

याच्या पान, देठाच्या भाजीचा स्वाद जितका खमंग तितकीच ती जीवनसत्व, लोह, तांब, क्षार, तंतूमय असलेली भाजी. यामुळे कर्करोग, रक्तदाब, लकवा, यकृतासाठी फायदेशीर असते.

अंबाडी

पानाच्या स्वरूपात कांद्यासोबत आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी चवीस आंबटगोड अशीच. रोगप्रतिकारशक्तीवर्धक अंबाडीत लोह, जीवनसत्व अ आणि क, फोलेट, झिंक असे अँटी ऑक्सिडंट असतात.

चंदन बटवा

चंदन बटवा ही एक पानाच्या स्वरूपात उपलब्ध होणारी प्रमुख रानभाजी आहे. कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर असलेली ही भाजी अपचन, बद्धकोष्ठता यासाठी गुणकारी आहे.

या रानभाज्या झाल्या गायब...

तरवटाची भाजी विस्मृतीत

या भागात तरवट म्हणून आढळणारी भाजी आता दुर्मीळ झाली आहे. भुईमूग, मेथीसारखी पाने व लहान पिवळी फुले असलेली ही भाजी संधीवात, स्नायुदुखी अशा विविध आजारांसाठी बहुगुणी आहे. अशी हा रानभाजीची आता केवळ आठवण राहिली आहे.

चिलाची चव कुठे चाखावी?

ग्रामीण भागातील चिलाची भाजी काळाच्या ओघात लुप्त झाली आहे. वात, पित्त व कफ या त्रिदोषाला शांत करणारी ही पालेभाजी पाहावयास मिळत नाही.

तज्ज्ञाचा कोट

शक्तिवर्धक रानभाज्या

शेत शिवारात निसर्गतः येणाऱ्या रानभाज्या या आरोग्यदायी असतात. त्यांच्या उपलब्धतेसाठी ना बियाण्यांची, खतांची गरज असते ना मशागतीची. आपोआप येणाऱ्या या भाज्या चविष्ट तर असतात शिवाय खनिजांची पूर्तता करणाऱ्या असतात. तंतूमय असल्याने अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात. यातील प्रत्येक भाजीचे स्वतंत्र औषधी गुणधर्म असल्याने चयापचय क्रिया सुरळीत होते.