शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:45 IST

गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते.

ठळक मुद्देपाच वेळा आले अपयश, सोडली नाही जिद्दभारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक यावर्षी दोन मोठ्या परीक्षेत मिळवले यश

उमरगा (जि़उस्मानाबाद) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत एकूरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी देशात ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक पटकाविला होता. वडील एसटीत मेकॅनिक असले तरी त्यांनी दिलेल्या पाठबळावर जिद्दीने असितने हे शिखर सर करुन दाखविले आहे़

असित यांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण एकूरगा गावीच झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अहमदपूर येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केले़ त्यांचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळ उमरगा येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत होते़ ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आई ललिता कांबळे अंगणवाडी सेविका आहेत़ प्रतिकूल परिस्थिती असतानाही मुलगा हुशार असल्याने त्यांनी असितच्या पंखात बळ भरले़ त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. आजही ते एकूरगा या गावात पत्र्याच्या घरात राहतात. आई-वडिलांनी पाहिलेले नागरी सेवेचे स्वप्न मुलाने अखेर पूर्ण केले. 

पाच वेळा आले अपयश, सोडली नाही जिद्दगेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते. असित हे २०१३ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. तब्बल पाच वेळा त्यांना अपयश आले. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. सहाव्या प्रयत्नात त्यांना हे यश लाभले आहे. त्यात वनसेवा व नागरी सेवेच्या लेखी परिक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वेळा मुलाखतीत यश मिळाले नव्हते़ जिद्द न सोडता त्यांनी प्रयत्न केले अन् यावर्षी या दोन्ही परिक्षांत त्यांनी दैदिप्यमान यश मिळविले़ या यशानंतर त्यांच्यावर एकुरगा या गावी नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला़

न्यूनगंड बाळगू नका याच वर्षी भारतीय वनसेवा स्पर्धा परीक्षेत निवड झाली होती़ आता नागरी सेवेतही निवड झाली आहे़ त्यामुळे मोठा आनंद झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकलोय म्हणून यश मिळणार नाही, असा न्यूनगंड बाळगू नये. परीक्षा कठीण असल्या तरी अभ्यासात कठोर परिश्रम, एकाग्रता व चिकाटी महत्त्वाची आहे़ यश नक्की मिळते. या प्रवासात आई-वडीलांचे, बहिणीचे आणि आजी-आजोबांचे तर आशिर्वाद असतातच. पण त्यांच्याइतकेच माझ्या सर्व शिक्षकांचे माझ्या आयुष्यात योगदान आहे.- असित कांबळे, आयएएस, ६५१ वी रँक

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगOsmanabadउस्मानाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र