शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:45 IST

गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते.

ठळक मुद्देपाच वेळा आले अपयश, सोडली नाही जिद्दभारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक यावर्षी दोन मोठ्या परीक्षेत मिळवले यश

उमरगा (जि़उस्मानाबाद) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत एकूरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी देशात ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक पटकाविला होता. वडील एसटीत मेकॅनिक असले तरी त्यांनी दिलेल्या पाठबळावर जिद्दीने असितने हे शिखर सर करुन दाखविले आहे़

असित यांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण एकूरगा गावीच झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अहमदपूर येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केले़ त्यांचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळ उमरगा येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत होते़ ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आई ललिता कांबळे अंगणवाडी सेविका आहेत़ प्रतिकूल परिस्थिती असतानाही मुलगा हुशार असल्याने त्यांनी असितच्या पंखात बळ भरले़ त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. आजही ते एकूरगा या गावात पत्र्याच्या घरात राहतात. आई-वडिलांनी पाहिलेले नागरी सेवेचे स्वप्न मुलाने अखेर पूर्ण केले. 

पाच वेळा आले अपयश, सोडली नाही जिद्दगेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते. असित हे २०१३ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. तब्बल पाच वेळा त्यांना अपयश आले. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. सहाव्या प्रयत्नात त्यांना हे यश लाभले आहे. त्यात वनसेवा व नागरी सेवेच्या लेखी परिक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वेळा मुलाखतीत यश मिळाले नव्हते़ जिद्द न सोडता त्यांनी प्रयत्न केले अन् यावर्षी या दोन्ही परिक्षांत त्यांनी दैदिप्यमान यश मिळविले़ या यशानंतर त्यांच्यावर एकुरगा या गावी नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला़

न्यूनगंड बाळगू नका याच वर्षी भारतीय वनसेवा स्पर्धा परीक्षेत निवड झाली होती़ आता नागरी सेवेतही निवड झाली आहे़ त्यामुळे मोठा आनंद झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकलोय म्हणून यश मिळणार नाही, असा न्यूनगंड बाळगू नये. परीक्षा कठीण असल्या तरी अभ्यासात कठोर परिश्रम, एकाग्रता व चिकाटी महत्त्वाची आहे़ यश नक्की मिळते. या प्रवासात आई-वडीलांचे, बहिणीचे आणि आजी-आजोबांचे तर आशिर्वाद असतातच. पण त्यांच्याइतकेच माझ्या सर्व शिक्षकांचे माझ्या आयुष्यात योगदान आहे.- असित कांबळे, आयएएस, ६५१ वी रँक

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगOsmanabadउस्मानाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र