शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

चोरट्यांच्या तपासासाठी दोन पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:29 IST

शनिवारी पहाटेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील भाविक कारव्दारे औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील इंदापूर फाट्यानजीकच्या वळणावर रोडलगत ...

शनिवारी पहाटेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील भाविक कारव्दारे औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील इंदापूर फाट्यानजीकच्या वळणावर रोडलगत बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी काहीतरी वस्तू भरधाव कारच्या समोर अचानक टाकल्याने कारचालकाचा ताबा सुटून कार खड्ड्यांत जाऊन पलटी झाली होती़ यामध्ये कारमधील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत़ अपघात झाल्याबरोबर मदतीच्या बहाण्याने अज्ञात लुटारू कारजवळ गेले व जखमी अवस्थेतील महिलांच्या गळ्यातील तीन लाख रुपये सोन्याचे दागिने लुबाडून नेले़ दरम्यान, जखमींनी विरोध केला असता त्यांना मारहाणही चोरट्यांनी केली़ वाशी तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गासह शिर्डीकडे जाणा-या मार्गावर अज्ञात चोरट्यांकडून वाहने अडवून तर कधी चालत्या ट्रकवर चढून लुटीचे प्रकार घडत आहेत़ सध्या मोठी कार अडवून अपघात घडवून त्यांना लुटण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे़ मध्यंतरी पंढरपूर येथील व्यापा-याची कार अडवून त्याला लुटले होते़ त्याचा तपास लावण्यात येरमाळा पोलिसांना यशही आले होते. अशाच प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत़ अनेक जण पोलिसात तक्रार दाखल न करता पोलिसांचा ससेमिरा व न्यायालयीन लढाई नको म्हणून पोलिसात जाण्याचे टाळत आहेत़ महामार्गावरील धाब्यावर काही ट्रकचालक थांबल्यास त्यांच्या ट्रकमधील काहीतरी सामान अथवा डिझेल चोरीस जात आहे़ पोलिसात चोरीच्या नोंदी होतात मात्र पुढे काय होते, याची माहिती आम नागरिकांना कळत नाही. शनिवारी पहाटेच्या सुमारास तेलंगणा राज्यातील भाविक कारमधून नवीन रामलू केतावत व त्यांचे कुटुंबीय शिडीस जात असताना पहाटेच्या सुमारास त्यांच्या भरधाव गाडीसमोर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात बसलेल्या अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी कारच्या समोर काहीतरी वस्तू टाकली. यामुळे कारचालकाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये कारमधील जखमींना बाहेर काढत असताना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील दागदागिने लुटले. महामार्गावर वाहने थांबत असल्याचे दिसताच त्यांनी पळ काढला़ पोलिसात या घटनेचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यांनी चोरांच्या मुस्क्या आवळण्यासाठी दोन पथके निर्माण केली आहेत़ आम्ही लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड करून असा विश्वास व्यक्त केला आहे़ सध्यातरी महामार्गावरून लहानमोठ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी यामध्ये लक्ष घालून नागरिकांत विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे़