शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप : दहावी-अकरावी गुणांनी वाढविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

उमरगा : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे गुण ...

उमरगा : बारावीच्या निकालात ३०:३०:४० टक्के म्हणजे दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के आणि बारावी ४० टक्के असे गुण घेण्याचे ठरले आहे. तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण मिळणार आहेत. याचाच फटका बसण्याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युला ठरला आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास ३० टक्के वेटेज दिले जाईल. इयत्ता बारावीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला ४० वेटेज दिले जाईल, हे सूत्र निकालाचे असणार आहे. बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाईल. तसेच ज्या मुलांना परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.

३१ जुलैला निकाल जाहीर होणार आहे. यात दहावीच्या पाच विषयांपैकी तीन विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण, अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण आणि बारावी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुण घेतले जाणार आहेत. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीच्या गुणातील ३० टक्के आणि १२ वी च्या ४० गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील. या मूल्यांकन निकषांमुळे अकरावी रेस्ट इअर समजून बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या मुलांना फटका बसणार आहे. अकरावीचे गुण ३० टक्के धरण्यात येणार असल्याने ३० टक्के सूत्र गणित बिघडविणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी बारावीच्या गुणांची चिंता न करता पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा, असे शिक्षण तज्ज्ञ सांगत आहेत.

उमरगा तालुका बारावी स्टेट बोर्ड विद्यार्थी

मुले-१६१२

मुली-१५९१

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !

अनेक विद्यार्थी अकरावीला नियमित कॉलेज करीत नाहीत. दहावीला अभ्यास करून बोर्ड परीक्षा दिल्याने अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात. अकरावीच्या ३० टक्क्यांमुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होईल. त्यापेक्षा ३०:२०:५० हा फॉर्म्युला असायला हवा होता.

- राणा पवार, विद्यार्थी, उमरगा

अकरावीमध्ये प्रवेश केल्यानंतर अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी बराच वेळ जातो. तसेच ११ वी वर्गाकडे ‘रेस्ट इअर’ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे अकरावीत अपेक्षेप्रमाणे गुण मिळत नाहीत. बारावीलासुद्धा त्याआधारे गुण दिले गेले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.

- प्रीती प्रदीप मोरे, विद्यार्थिनी

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षेवर फोकस ठेवावा

सध्या बारावीचा निकाल तयार करणे चालू आहे. निकाल तयार करण्यासाठी ३०-३०-४० हा फॉर्म्युला वापरला जातो आहे. यामुळे ज्यांनी वर्षभर काहीच अभ्यास केला नाही व ज्यांनी खूप अभ्यास केला ते सर्व जवळपास थोड्या मार्काच्या फरकाने पास होत आहेत. त्यामुळे पुढील सर्व अभ्यासक्रमांसाठी सीईटीचे मार्क गृहीत धरावे.

- प्रा. डी. टी. पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

बारावीच्या निकालासाठी शासनाने सांगितलेल्या मूल्यांकनाच्या ३०:३०:४० या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गुण कमी होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. परंतु विद्यार्थ्यांनी या निकालाचा विचार न करता उच्च शिक्षणासाठी असलेल्या प्रवेश परीक्षाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.

- प्रा. प्रशांत साळुंके, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा.