शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

धूळखात पडलेल्या घंटागाड्या चालू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST

वाशी : नगर पंचायतीने घनकचरा वाहतूक करणाऱ्या नवीन घंटागाड्या खरेदी केल्या. मात्र, मागील पाच महिन्यांपासून त्या धूळ खात पडून ...

वाशी : नगर पंचायतीने घनकचरा वाहतूक करणाऱ्या नवीन घंटागाड्या खरेदी केल्या. मात्र, मागील पाच महिन्यांपासून त्या धूळ खात पडून असून, त्या सुरू कराव्यात, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब वाघमारे यांनी केली आहे.

घंटागाड्या बंद ठेवल्यामुळे शहरातील विविध भागातील कचरा उचलण्याचे कामही ठप्प आहे. परिणामी संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या चिकुनगुनिया, थंडीताप अशा आजारांचे अनेक रुग्ण शहरात असून, खासगी दवाखान्यातील रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे. नगर पंचायतीने घनकचरा उचलण्यासाठी पाच घंटागाड्यांची खरेदी केली. आरटीओ कार्यालयाकडून याचे पासिंगही झाले. मात्र, अजूनही या गाड्या वापराअभावी धूळखात पडून आहेत. सध्या ज्या गाड्या चालू आहेत त्याही कधी येतात, याचा नागरिकांना पत्ता लागत नाही. त्यामुळे या घंटागाड्या सुरू करून कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चौकट.......

पाणी पुरवठ्याचेही नियोजन नाही...

नगर पंचायतीकडून शहरवासीयांना शुध्द व नियोजनबध्द पाणीपुरवठा होत नाही. सध्या आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे. यावर भैय्यासाहेब वाघमारे यांच्यासह अमोल जानराव, सुशांत सुकाळे, किशोर गायकवाड, नितीन सुकाळे, महावीर सुकाळे, सुजित मस्के, संग्राम बनसोडे आदींच्या सह्या आहेत.