शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तहसीलदार गणेश माळींची बदली, 'इनाम'धारकांचा श्वास मोकळा

By चेतनकुमार धनुरे | Updated: April 13, 2023 19:36 IST

वाळूसाठा प्रकरणात तहसिदारांनी एका कार्यकर्त्यास श्रीमुखात भडकविल्याची चर्चा दीर्घकाळ चालली.

धाराशिव : येथील तहसीलदार गणेश माळी यांची बुधवारी रात्री निघालेल्या आदेशान्वये बदली झाली आहे. त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. दरम्यान, त्यांच्या बदलीमुळे प्रामुख्याने इनामी जमीनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे. काही निर्णय व बेधडक वृत्तीमुळे माळी हे कायम चर्चेत राहिले.

धाराशिवचे तहसीलदार गणेश माळी हे बेडर अधिकारी म्हणून परिचित होते. वाळूसाठा प्रकरणात त्यांनी एका कार्यकर्त्यास श्रीमुखात भडकविल्याची चर्चा दीर्घकाळ चालली. तेथून ते अधिक चर्चेत आले. लोकप्रतिनिधींना न जुमानणारे म्हणूनही ते ओळखले गेले. इनामी जमिनी बेकायदेशीरपणे नावे लावून घेत त्यांचे व्यवहार केल्याबद्दल अनेक जमीनधारकांना अलिकडेच नोटिसा बजावल्या होत्या. लाखो रुपयांचा महसुली नजराणा भरण्याची तंबी देतानाच २५ टक्के दंडही लावून त्यांनी इनामी जमीनधारकांत खळबळ उडवून दिली होती. अशाच वेगवेगळ्या प्रकरणांनी ते कायम चर्चेत राहिले. त्यांची बदली झाल्याने अनेकांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील तहसीलदार शिवानंद बिडवे हे येत असून, लवकरच ते पदभार घेणार आहेत.

टॅग्स :TahasildarतहसीलदारOsmanabadउस्मानाबाद