शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

निझामाच्या नजरेत धूळ फेकून राष्ट्रीय शाळेने घडविले क्रांतीकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST

लोहारा : मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ज्या शाळेतून खरी उर्जा मिळाली, त्या लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला यंदा १०० ...

लोहारा : मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ज्या शाळेतून खरी उर्जा मिळाली, त्या लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. निझामाची करडी नजर या शाळेवर असतानाही सशस्त्र लढ्यातील आक्रमक क्रांतीकारक घडविण्याचे कार्य येथून झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी येथे मुख्याध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करतानाच देशभक्ती अन् स्वातंत्र्यलढ्याचे धडेही विद्यार्थ्यांना दिले.

निझामाच्या राजवटीत मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सुविधा नव्हती. तेव्हा १९२१ साली हिप्परगा (रवा) येथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. त्याकाळी शाळा सुरू करणे म्हणजे निझाम सरकारचा राजद्रोह केल्यासारखे होते. तरीही देशप्रेमाने भारावलेल्या व्यंकटराव देशमुख व अनंतराव कुलकर्णी यांनी विश्वनाथ होणाळकर, आनंदराव पाटील यांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय शाळा सुरू केली. १९२३ साली स्वामी रामानंद तीर्थ या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. वर्षभरातच शाळेचा पट १७६ वर गेला. अवघ्या चार ते पाच वर्षातच आडमार्गावर असलेल्या या शाळेकडे मुंबई प्रांत व हैद्राबाद संस्थानचे लक्ष वेधले गेले. विद्यार्थी व शिक्षक झोपडीत रहायचे. २३ शिक्षकांसाठी २३ झोपडया व ७८ खणाची इमारत तयार केली. येथे स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे,एस.के. केळकर, श्रीपाद कुलकर्णी, अमृत गवळी आदी शिक्षक होते. शाळेतून ज्ञानदानासोबतच ज्वलंत राष्ट्रभक्तीचे धडे दिले जायचे. त्यामुळे साहजिकच शाळेवर लक्ष ठेवण्यासाठी निझामाने येथे पोलीस चौकी बांधली. चार पोलीस व एक अमीनसाब कोतवाली (सब इन्स्पेक्टर) यांची नेमणूक केली. तरीही त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वामी रामानंद तीर्थ व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे व क्रांतीचे स्फुलिंग पेटविले. त्यामुळे या शाळेतून स्वातंत्र्याच्या महत्वाकांक्षेने भारलेल्या क्रांतीकारकाच्या फळया तयार झाल्या. १९४१ मध्ये शाळेने एक मोठा वार्षिकोत्सव (स्नेहसंमेलन) साजरा केला. १९४३ च्या उत्सवात वि.स. खांडेकर यांचे व्याख्यान झाले होते. यानंतर निझामाने संस्थाचालकाना अटक करणे, त्रास देणे, चौकीवर दररोज हजेरी लावणे, तसेच शिक्षकांना त्रास देण्यास सुरुवात केली. याच कालावधीत रझाकार चळवळही फोफावली होती. सोबतीला प्लेगची साथ आली. या सर्व बाबीमुळे १९४६ ला शाळेचे कामकाज बंद पडले. त्यानंतर याच शाळेची प्रेरणा घेऊन त्याच ठिकाणी १९८६ मध्ये नव्याने स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. ती आजतागायत सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रीय शाळेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या याठिकाणी एक स्मारक उभे आहे. मात्र, त्याचे सुशोभिकरण करण्याची गरज आहे. येथे संग्रहालय, वाचनालय उभारुन मुक्तीसंग्रामाच्या लढ्याला उजाळा देण्याची गरज ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

कोट...

जिल्हा प्रशासनामार्फत मुक्तीसंग्रामातील महत्त्वाची स्मारके, संग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यातून मुक्तीसंग्राम लढ्याला निश्चितच उजाळा मिळेल.

-कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी

भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि त्यांनतर हैदराबाद मुक्तीसंग्रामात या शाळेचे मोठे योगदान आहे. शाळेच्या माध्यमातून जे कार्य झाले आहे ते ऐतिहासिक असे आहे. या ऐतिहासिक कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे ऋण कधीही पूर्ण करणे अशक्य आहे. या शाळेतील प्रेरणेची ऊब कायम राखण्यासाठी आपण निश्चितच पुढाकार घेणार आहोत.

-ज्ञानराज चौगुले, आमदार