शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

तुळजापुरात तीन दिवस नो एंट्री; कोजागिरीची गर्दी रोखण्यासाठी जिल्हाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 19:27 IST

Next three days no entry in Tuljapur : शारदीय नवरात्र महोत्सवातील कोजागिरी पौर्णिमेस तुळजापुरात सर्वात मोठी यात्रा भरत असते.

उस्मानाबाद : काजागिरी पौर्णिमेला तुळजापुरात मोठी यात्रा भरते. या यात्रेला सुमारे ८ ते १० लाख भाविक जमत असतात. ही गर्दी टाळण्यासाठी यंदा मंदिर प्रशासनाने यात्राच रद्द केली आहे, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ( Next three days no entry in Tuljapur) जिल्हाबंदी लागू केली आहे. त्यामुळे तीन दिवस तुळजापूर किंबहुना जिल्ह्यातच कोणत्याही नागरिकांना नो एंट्री असणार आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवातील कोजागिरी पौर्णिमेस तुळजापुरात सर्वात मोठी यात्रा भरत असते. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा यावेळी रद्द करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. १९ व २० ऑक्टोबरला असलेल्या या पौर्णिमेच्या दिवशी राज्यातीलच नव्हे, तर शेजारच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यातील भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत, तर पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी अवजड मालवाहतुकीच्या वाहनांना तुळजापूर मार्ग बदलून अन्य मार्गे वाहतूक वळविण्याचे आदेश दिले आहेत. १८, १९ व २० ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यात, तसेच तुळजापुरातही केवळ रुग्णसेवा, पोलीस, अग्निशमन, एसटी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी किंवा इतरही प्रवाशांनी तीन दिवसांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.वाहतूक मार्गात बदल...दरम्यान, वाहनांना प्रवेशबंदी असली, तरी आडवाटेने पायी येणारे भाविक जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. उस्मानाबादहून हैद्राबादकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना औसा-उमरगा मार्गाचा पर्याय दिला आहे. औरंगाबादहून हैद्राबाद जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना मांजरसुंबा-लातूर-उमरगा मार्ग, उस्मानाबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना वैराग मार्ग, लातूर ते सोलापूरसाठी बार्शी-येडशी-मुरुड मार्ग, तर औरंगाबाद ते सोलापूरसाठी येरमाळा-बार्शी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद