शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रझाकारांच्या गोळीबारात १३ तरुण पडले होते धारातीर्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST

कळंब : चैत्राच्या रखरखत्या उन्हात घाडगेंच्या आमराईतील भरल्या बाजारात निजामी राजवटीचे जुलमी ‘बळ’ अचानक दाखल झाले. वार, प्रतिवार चालू ...

कळंब : चैत्राच्या रखरखत्या उन्हात घाडगेंच्या आमराईतील भरल्या बाजारात निजामी राजवटीचे जुलमी ‘बळ’ अचानक दाखल झाले. वार, प्रतिवार चालू झाला. पण, धानोऱ्याच्या पहिलवानांची ‘लाठीकाठी’ हत्यारबंद निजामी शक्तीपुढे फिक्की ठरली. बंदुकीच्या फैरी झडल्या, यात क्षणार्धात १३ देवधानोरेकर धारातीर्थी पडले. दुसऱ्या दिवशी अख्खं गाव हैवानांनी पेटवून दिलं. देवधानोऱ्याची अवस्था ‘जळकं धानोरं’ अशी झाली आणि गावकरी अंगावरच्या कापडानिशी परागंदा झाले. हा चित्तथरारक प्रसंग कथन केला आहे देवधानोरा येथील स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मारुती बोंदर यांनी.

हा प्रसंग घडला त्या १८ एप्रिल १९४८ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मारुती बोंदर हे १६ वर्षांचे होते. या काळात काँग्रेसी विचाराने प्रेरित होऊन जुलमी निजामी राजवटीचा ते प्रतिकार करीत होते. प्रभातफेऱ्या, गस्त यासह त्या काळी चळवळीचा पाया असलेल्या कॅम्पात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला असता अतिशय चित्तथरारक असा प्रसंग त्यांनी कथन केला.

त्या दिवशी देवधानोरा गावात आठवडी बाजार असल्याने संपूर्ण गाव गजबजले होते. याच दिवशी निजाम सरदार कासीम रझवीचा खास ‘हस्तक’ गुंडूबाशा रझाकारांचा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाला. त्यांनी धाकदडपशाही सुरू केली असता प्रतिकारही सुरू झाला. ग्रामस्थांच्या काठ्या-कुऱ्हाडी विरुद्ध रझाकारांच्या बंदुकी असा संघर्ष पेटला. रझाकारांना विरोध करणारी शक्ती म्हणून निजामी सत्तेच्या डोळ्यांवर देवधानोरा गाव आले होते. याचा बीमोड करण्यासाठीच सुनियोजित कट करून गाव बेचिराख करण्याचा प्रयत्न केला गेला, असे बोंदर यांनी सांगितले.

देवधानोऱ्याचं जळकं धानोरा केलं...

गावातील दुसरे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाजीराव गणपतराव बोंदर म्हणाले, १८ एप्रिल १९४८ रोजी एका क्षणात १३ तरुण गोळीबारात धारातीर्थी पडल्याने गावकरी भयानक दहशतीखाली होते. जुलमी ताकदीने बाजार, घरंदारं लुटली. दुसऱ्या दिवशी रॉकेलने गावातील घरे, गंजी, गोठे पेटवून दिले. क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या गावात चिटपाखरू राहिलं नाही. लोक आपल्या गणगोताकडे, कॅम्पात ‘निर्वासित’ म्हणून आलेला दिवस काढू लागले. याच घटनाक्रमामुळे स्वातंत्र्योत्तर काळात महसुली ‘देवधानोरा’ असं नाव असलेलं आमचं गाव एकमेकांशी संवाद साधकांना मात्र ‘जळकं धानोरं’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.

▪️ सहा महिने गावात दिवा पेटला नाही...

रझाकारानं गाव लुटलं अन् जाळलं. अडीचशे उंबऱ्याच्या गावातील लोक तोंड वळेल त्या गावात आणि नातेवाइकाकडे आश्रित म्हणून राहू लागले. सहा महिने गावात दिवा पेटला नाही. घराला दार अन् विहिरीला पायऱ्या राहिल्या नाहीत. या काळात पुढे स्वामी रामानंद तीर्थ चंद्रशेखर बाजपेयी, बाबासाहेब परांजपे या नेतृत्वाची साथ मिळाली. इकडून तडवळा, चिंचोलीच्या कॅम्पात आधार मिळाला. लोक परतू लागले. घरी स्थिरावू लागले. आजूबाजूच्या गावांतून ज्वारी वगैरे जिन्नस पोहचू लागले. कळंबच्या भगवानदास लोढा यांनी एक ट्रक घोंगड्या दिल्या. एकूणच विस्कटलेले गाव अन् घडी पुन्हा बसू लागली, असे लक्ष्मण बोंदर यांनी सांगितले.