शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीच नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 15:44 IST

दुष्काळाचे चटके सोसणारे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजरा लावून बसले आहेत. 

ठळक मुद्देउस्मानाबादसह परंडा, भूममध्ये विदारक स्थिती आजघडीला अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे.

उस्मानाबाद :  जून आणि अर्धाअधिक जुलै महिना सरत आला असतानाही वार्षिक सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पाऊस झाला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाचा परिणाम थेट खरीप पेरणीवर होवू लागला आहे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्याने शेतकरी पेरणी कासव गतीने सुरू आहे. आजघडीला अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे.  असे असले तरी सुमारे सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी होणे बाकी आहे. त्यामुळे दुष्काळाचे चटके सोसणारे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजरा लावून बसले आहेत. 

गतवर्षी जून महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. परंतु, यंदा याच्या उलट चित्र आहे. संपूर्ण जून महिन्यात वार्षिक सरसरीच्या अत्यल्प पर्जन्यमान झाले. जुलै महिन्यात तरी दमदार पाऊस होईल, असे अपेक्षित होते. परंतु, अर्धाअअधिक जुलै सरत आला असतानाही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. सरासरी १८.८ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे. सर्वात कमी १०.५ टक्के पाऊस लोहारा तालुक्यात झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. आजवर अवघा १२.२ टक्केच पाऊस पडला. उमरगा, भूम याही तालुक्यात फारसे समाधानकारक चित्र नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानाचा थेट परिणाम खरीप पेरणीवर होताना दिसत आहे. मंडळनिहाय झालेल्या पावसावर नजर टाकली असता, अत्यंत विदारक वास्तव समोर येते. असमान पाऊस होत असल्याने एकेका मंडळात अद्याप पेरणीला सुरूवातही झालेली नाही. 

संपूर्ण जिल्ह्यात मिळून केवळ ३४.२२ टक्के पेरणी झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात पेरणीचा टक्का सर्वात कमी आहे. आजघडीला अवघ्या १३.९२ म्हणजेच अवघ्या १४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ८९ हजार हेक्टर पैकी तब्बल ७६ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीविना आहे. यानंतर भूम तालुक्याचा क्रमांक लागतो. २९ हजार २०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित असताना ८ जुलै अखेर केवळ ७ हजार २०० म्हणजेच २४ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे. परंडा तालुक्यातील चित्रही चिंताजनकच आहे. मागील दीड महिन्यात २६.६८ टक्के पेरणी झाली आहे. १७ हजार हेक्टर पैकी साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होवू शकली. वाशी तालुक्यातील ३९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित असताना १३ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. याचे प्रमाण ३४.२४ टक्के आहे. दरम्यान, खरीप पेरणीत कळंब अव्वल आहे. जवळपास ५८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ६४ हजार ३०० पैकी ३७ हजार ७०० हेक्टवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यात अनुक्रमे ३९ व ३६ टक्के पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर पेरणी केली. त्यामुळे बियाण्याची उगवण झाली नसल्याचे तक्रारीही आता येऊ लागल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती