शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

उस्मानाबाद जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीच नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 15:44 IST

दुष्काळाचे चटके सोसणारे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजरा लावून बसले आहेत. 

ठळक मुद्देउस्मानाबादसह परंडा, भूममध्ये विदारक स्थिती आजघडीला अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे.

उस्मानाबाद :  जून आणि अर्धाअधिक जुलै महिना सरत आला असतानाही वार्षिक सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पाऊस झाला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाचा परिणाम थेट खरीप पेरणीवर होवू लागला आहे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्याने शेतकरी पेरणी कासव गतीने सुरू आहे. आजघडीला अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे.  असे असले तरी सुमारे सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी होणे बाकी आहे. त्यामुळे दुष्काळाचे चटके सोसणारे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजरा लावून बसले आहेत. 

गतवर्षी जून महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. परंतु, यंदा याच्या उलट चित्र आहे. संपूर्ण जून महिन्यात वार्षिक सरसरीच्या अत्यल्प पर्जन्यमान झाले. जुलै महिन्यात तरी दमदार पाऊस होईल, असे अपेक्षित होते. परंतु, अर्धाअअधिक जुलै सरत आला असतानाही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. सरासरी १८.८ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे. सर्वात कमी १०.५ टक्के पाऊस लोहारा तालुक्यात झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. आजवर अवघा १२.२ टक्केच पाऊस पडला. उमरगा, भूम याही तालुक्यात फारसे समाधानकारक चित्र नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानाचा थेट परिणाम खरीप पेरणीवर होताना दिसत आहे. मंडळनिहाय झालेल्या पावसावर नजर टाकली असता, अत्यंत विदारक वास्तव समोर येते. असमान पाऊस होत असल्याने एकेका मंडळात अद्याप पेरणीला सुरूवातही झालेली नाही. 

संपूर्ण जिल्ह्यात मिळून केवळ ३४.२२ टक्के पेरणी झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात पेरणीचा टक्का सर्वात कमी आहे. आजघडीला अवघ्या १३.९२ म्हणजेच अवघ्या १४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ८९ हजार हेक्टर पैकी तब्बल ७६ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीविना आहे. यानंतर भूम तालुक्याचा क्रमांक लागतो. २९ हजार २०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित असताना ८ जुलै अखेर केवळ ७ हजार २०० म्हणजेच २४ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे. परंडा तालुक्यातील चित्रही चिंताजनकच आहे. मागील दीड महिन्यात २६.६८ टक्के पेरणी झाली आहे. १७ हजार हेक्टर पैकी साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होवू शकली. वाशी तालुक्यातील ३९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित असताना १३ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. याचे प्रमाण ३४.२४ टक्के आहे. दरम्यान, खरीप पेरणीत कळंब अव्वल आहे. जवळपास ५८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ६४ हजार ३०० पैकी ३७ हजार ७०० हेक्टवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यात अनुक्रमे ३९ व ३६ टक्के पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर पेरणी केली. त्यामुळे बियाण्याची उगवण झाली नसल्याचे तक्रारीही आता येऊ लागल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती