शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

...तर मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार !; राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:17 IST

दीर्घ लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाला किमान प्रतीलिटर ४० रूपये दर मिळाला असता.

ठळक मुद्देप्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

उस्मानाबाद : दूध दरवाढीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावे, अन्यथा सरकारमधील मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

दूध दरवाढ प्रश्नी शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, पशुधनासह मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘दूधाच्या दरात घसरण झाली आहे. त्यास केंद्र तसेच राज्य सरकारचे धोरण आणि कडक लॉकडाऊन जबाबदार आहे. दीर्घ लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाला किमान प्रतीलिटर ४० रूपये दर मिळाला असता. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली; परंतु, काहीच मार्ग निघाला नाही. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अद्याप चर्चा होऊ शकली नाही.’’ ते ‘मातोश्री’बाहेर पडत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.  दूध उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने प्रतीलिटर ५ रूपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करावे. अन्यथा मंत्र्यांना दुग्धाभिषेक घातला जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

६ कोटी लिटर दूध गेले कुठे? दूध दरवाढीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ६ एप्रिल रोजी सरकारने बैठक घेऊन दुधाला २५ रुपये व वाहतुकीसाठी २ रुपये, असा २७ रुपये दर शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आला. ६ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत सरकारने ६ कोटी लिटर दूध खरेदी केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केल्यानंतरही दर काही उंचावले नाहीत. त्यामुळे ६ कोटी लिटर दूध गेले कुठे, असा सवाल माजी खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीmilkदूधState Governmentराज्य सरकार