शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

...तर मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार !; राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:17 IST

दीर्घ लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाला किमान प्रतीलिटर ४० रूपये दर मिळाला असता.

ठळक मुद्देप्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

उस्मानाबाद : दूध दरवाढीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावे, अन्यथा सरकारमधील मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

दूध दरवाढ प्रश्नी शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, पशुधनासह मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘दूधाच्या दरात घसरण झाली आहे. त्यास केंद्र तसेच राज्य सरकारचे धोरण आणि कडक लॉकडाऊन जबाबदार आहे. दीर्घ लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाला किमान प्रतीलिटर ४० रूपये दर मिळाला असता. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली; परंतु, काहीच मार्ग निघाला नाही. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अद्याप चर्चा होऊ शकली नाही.’’ ते ‘मातोश्री’बाहेर पडत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.  दूध उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने प्रतीलिटर ५ रूपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करावे. अन्यथा मंत्र्यांना दुग्धाभिषेक घातला जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

६ कोटी लिटर दूध गेले कुठे? दूध दरवाढीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ६ एप्रिल रोजी सरकारने बैठक घेऊन दुधाला २५ रुपये व वाहतुकीसाठी २ रुपये, असा २७ रुपये दर शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आला. ६ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत सरकारने ६ कोटी लिटर दूध खरेदी केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केल्यानंतरही दर काही उंचावले नाहीत. त्यामुळे ६ कोटी लिटर दूध गेले कुठे, असा सवाल माजी खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीmilkदूधState Governmentराज्य सरकार