शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 21, 2023 14:18 IST

तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत.

धाराशिव : मराठा समाजाला ५० टक्केच्या आतील आरक्षण ओबीसीमधूनच देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने तुळजापूर ते मंत्रालयादरम्यान ‘मराठा वनवास यात्रा’ काढली जाणार आहे. यात्रेस ६ मे रोजी तुळजापूर येथून प्रारंभ होईल व ती ६ जून रोजी मंत्रालयावर धडकेल, अशी माहिती मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिली.

सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत संयोजक योगेश केदार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी ६ मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेस सुरुवात होईल. ही यात्रा विविध गावांत मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळादिनी मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. यंदाचा राज्याभिषेक सोहळा मराठा बांधव आझाद मैदानावरच साजरा करतील, असे सांगितले. या यात्रेत हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, तसा अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यंत मराठा बांधव ठिय्या मांडून बसणार असल्याचे केदार म्हणाले. जास्तीत जास्त समाजबांधवांनी मराठा वनवास यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले.

पावणेपाचशे किलोमीटरचा प्रवास...तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत. तुळजापूर ते मुंबई दरम्यान ९२ गावांमधून ही यात्रा जाणार आहे. काही गावांमध्ये मुक्काम व सभाही होणार आहेत. पहाटे पाच ते सकाळी १० व सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवास केला जाणार आहे. असे मराठा वनवास यात्रा संयोजक सुनील नागणे म्हणाले.

पवारांनी खंजीर खुपसला...२३ मार्च १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ओबीसीचे आरक्षण वाढवून ५० टक्केचा कोटा पूर्ण केला. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण गेले. शरद पवार यांनी असा निर्णय घेऊन मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप संयोजकांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार