शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिव जिल्ह्यातील गावगाड्याचा ठरणार स्वच्छता निर्देशांक !

By बाबुराव चव्हाण | Updated: September 30, 2023 18:43 IST

१२५ गुणांसाठी ‘परीक्षा’ : पहिल्या टप्प्यात ८० गावांचा समावेश...

धाराशिव : स्वच्छ भारत मिशन (टप्पा-२) अंतर्गत आता जिल्ह्यातील वाडी, वस्त्या अन् लहान-माेठ्या खेड्यांचा स्वच्छता (घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन) निर्देशांक निश्चित केला जाणार आहे. यासाठी आठ घटकांवर आधारित १२५ गुणांची ‘परीक्षा’ हाेणार आहे. जी ‘प्रॅक्टिकल बेस’ असेल. यासाठी पहिल्या टप्प्यात ८० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील पथके या गावांना भेटी देऊन गुणांकण करतील.

स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घर तिथे स्वच्छतागृह उभारल्यानंतर आता टप्पा-२ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून आता जिल्ह्यातील वाडी, वस्त्या, तांडे आणि लहान-माेठ्या खेड्यांचा स्वच्छता निर्देशांक निश्चित करण्यात येणार आहे. हा निर्देशांक निश्चित करताना डम्पिंग क्षेत्र, कचरा संकलन, कचरा वर्गीकरण, उघड्यावर शाैच, सांडपाणी व्यवस्थापन, सुशोभिकरण, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि लॅंडफिल हे आठ घटक विचारात घेतले जाणार आहेत. यासाठी १२५ गुण ठेवण्यात आले आहेत. गावात उपराेक्त आठ घटकांच्या अनुषंगाने झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जि.प. विभाग प्रमुख आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांचे पथक असेल. हे पथक गावात जावून पाहणी करून गुणदान करेल. ज्या गावाला ५० पेक्षा कमी गुण असतील, त्यांचे काम असमाधानकारक असेल.

स्वच्छता इंडिकेटर्सचे आज उद्घाटन...मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता इंडिकेटर्सचे १ ऑक्टाेबर राेजी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या हस्ते उद्घाटन हाेणार आहे. याप्रसंगी ‘एक तास स्वच्छतेसाठी’ हा श्रमदानाचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.

संनियंत्रण अधिकारी नियुक्त...स्वच्छता निर्देशांकारिता जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्धमान पाटणकर, संकेत चौधरी हे प्रकल्प समन्वयक म्हणून भूमिका निभावणार आहेत.

९० गुणांना अतिउत्कृष्ट शेरा...जिल्हा तसेच तालुकास्तरीय पथकांकडून गुणांकन केले जाणार आहेत. ९० गुण घेतल्यास संबंधित गावाला अतिउत्कृष्ट, ७० ते ९० गुण मिळाल्यास उत्कृष्ट, ५० ते ७० गुण प्राप्त झाल्यास चांगले तर ५० पेक्षा कमी गुण मिळाल्यास असमाधानकारक हा शेरा प्रगतीपुस्तकात नाेंदविला जाणार आहे.

पहिल्या टप्प्याचे काम सुरू करणारग्रामीण भागातील लहान-माेठ्या गावांचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन निर्देशांक निश्चित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ८० गावे निवडली आहेत. या निर्देशांकाचे उद्घाटन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या हस्ते आज हाेणार आहे.-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद, धाराशिव.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादgram panchayatग्राम पंचायत