शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

धाराशिव जिल्ह्यातील गावगाड्याचा ठरणार स्वच्छता निर्देशांक !

By बाबुराव चव्हाण | Updated: September 30, 2023 18:43 IST

१२५ गुणांसाठी ‘परीक्षा’ : पहिल्या टप्प्यात ८० गावांचा समावेश...

धाराशिव : स्वच्छ भारत मिशन (टप्पा-२) अंतर्गत आता जिल्ह्यातील वाडी, वस्त्या अन् लहान-माेठ्या खेड्यांचा स्वच्छता (घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन) निर्देशांक निश्चित केला जाणार आहे. यासाठी आठ घटकांवर आधारित १२५ गुणांची ‘परीक्षा’ हाेणार आहे. जी ‘प्रॅक्टिकल बेस’ असेल. यासाठी पहिल्या टप्प्यात ८० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील पथके या गावांना भेटी देऊन गुणांकण करतील.

स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घर तिथे स्वच्छतागृह उभारल्यानंतर आता टप्पा-२ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून आता जिल्ह्यातील वाडी, वस्त्या, तांडे आणि लहान-माेठ्या खेड्यांचा स्वच्छता निर्देशांक निश्चित करण्यात येणार आहे. हा निर्देशांक निश्चित करताना डम्पिंग क्षेत्र, कचरा संकलन, कचरा वर्गीकरण, उघड्यावर शाैच, सांडपाणी व्यवस्थापन, सुशोभिकरण, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि लॅंडफिल हे आठ घटक विचारात घेतले जाणार आहेत. यासाठी १२५ गुण ठेवण्यात आले आहेत. गावात उपराेक्त आठ घटकांच्या अनुषंगाने झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जि.प. विभाग प्रमुख आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांचे पथक असेल. हे पथक गावात जावून पाहणी करून गुणदान करेल. ज्या गावाला ५० पेक्षा कमी गुण असतील, त्यांचे काम असमाधानकारक असेल.

स्वच्छता इंडिकेटर्सचे आज उद्घाटन...मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता इंडिकेटर्सचे १ ऑक्टाेबर राेजी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या हस्ते उद्घाटन हाेणार आहे. याप्रसंगी ‘एक तास स्वच्छतेसाठी’ हा श्रमदानाचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.

संनियंत्रण अधिकारी नियुक्त...स्वच्छता निर्देशांकारिता जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्धमान पाटणकर, संकेत चौधरी हे प्रकल्प समन्वयक म्हणून भूमिका निभावणार आहेत.

९० गुणांना अतिउत्कृष्ट शेरा...जिल्हा तसेच तालुकास्तरीय पथकांकडून गुणांकन केले जाणार आहेत. ९० गुण घेतल्यास संबंधित गावाला अतिउत्कृष्ट, ७० ते ९० गुण मिळाल्यास उत्कृष्ट, ५० ते ७० गुण प्राप्त झाल्यास चांगले तर ५० पेक्षा कमी गुण मिळाल्यास असमाधानकारक हा शेरा प्रगतीपुस्तकात नाेंदविला जाणार आहे.

पहिल्या टप्प्याचे काम सुरू करणारग्रामीण भागातील लहान-माेठ्या गावांचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन निर्देशांक निश्चित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ८० गावे निवडली आहेत. या निर्देशांकाचे उद्घाटन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या हस्ते आज हाेणार आहे.-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद, धाराशिव.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादgram panchayatग्राम पंचायत