शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:10 IST

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे.

उस्मानाबाद : वैज्ञानिक संशोधनासाठी हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेकडून पुढील पाच महिन्यात वैज्ञानिक उपकरणांसह १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडण्यात येणार आहेत. ते उस्मानाबादसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पडण्याची शक्यता संस्थेने वर्तविली आहे. अशी उपकरणे जमिनीवर पडलेली आढळल्यास कोणीही स्पर्श न करता प्रशासनास माहिती कळविण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी केले आहे.

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे. यामध्ये संशोधनाच्या दृष्टीने वैज्ञानिक उपकरणे ठेवलेली असतील. ५० ते ८५ मीटर व्यासाचे हे फुगे हायड्रोजन वायूने भरलेले असतील. ते जमिनीपासून ३० ते ४२ किमी उंचीवरून उडतील. काही तासांच्या उड्डाणानंतर हे फुगे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात. हैदराबादपासून ते साधारणत: २५० ते ३०० किमी अंतरावर उतरतील, असा संस्थेचा अंदाज आहे.

या व्यासात कोणते जिल्हे...संस्थेचे हे फुगे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक राज्यातून वहन करणार आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव व सोलापूर जिल्ह्यात उतरण्याची शक्यता संस्थेने वर्तविली आहे.

हाताळणी ठरेल धोकादायक...फुग्यांमध्ये संवेदनशील वैज्ञानिक उपकरणे असतील. त्यांच्याशी छेडछाड झाल्यास महत्त्वाची माहिती नष्ट होऊ शकेल. तसेच काही उपकरणे हाय व्होल्टेज असल्याने त्यांची हाताळणी धोकादायक ठरू शकेल. यामुळे उपरोक्त फुगे जमिनीवर कोणास आढळल्यास पोलिस, डाक विभाग किंवा स्थानिक प्रशासनास कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीसही दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :scienceविज्ञानOsmanabadउस्मानाबादTataटाटा