शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फुप्फुसाव्यतिरिक्त अन्य अवयवांवरही ‘टीबी’ जिवाणूचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

धक्कादायक : चार वर्षांत सुमारे दीड हजारावर रुग्णांची भर उस्मानाबाद : आजवर क्षयराेगास (टीबी) फुप्फुसाचा आजार म्हणून ओळखले जायचे; ...

धक्कादायक : चार वर्षांत सुमारे दीड हजारावर रुग्णांची भर

उस्मानाबाद : आजवर क्षयराेगास (टीबी) फुप्फुसाचा आजार म्हणून ओळखले जायचे; परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे ‘टीबी’ या जिवाणूने आपला माेर्चा शरीरातील अन्य अवयवांकडेही वळविला आहे. त्यामुळेच की काय, मागील तीन-चार वर्षांपासून फुप्फुसाव्यतिरिक्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. सुमारे १ हजार ५३० अशा नवीन प्रकारातील रुग्णांची भर पडली आहे. ही बाब आराेग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी मानली जात आहे. चिंतेचा बाब यासाठी की, अशा रुग्णांचे निदान करण्यासाठीची आवश्यक साधणे आजही शासकीय दवाखान्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तूर्तास तरी क्षयराेग विभागाला खाजगी दवाखान्यांच्या रिपाेर्टवरच अवलंबून राहावे लागत आहे.

क्षयराेग हा संक्रमक राेग आहे. त्यामुळे हा आजार संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात पसरताे. या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर फुप्फुसावर प्रतिकूल परिणाम करतात. ज्यामुळे खाेकला, रक्ताची थुंकी, ताप तसेच वजन कमी हाेणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे ‘टीबी’ला फुप्फुसाचा आजार म्हणूनही ओळखले जाते; परंतु मागील तीन-चार वर्षांपासून ‘टीबी’चा जिवाणू फुप्फुसाव्यतिरिक्त मानवी शरीरातील लिम्प नाेड्स, हाडे, मेंदू, आतडे, मूत्रपिंडासारख्या इतर अवयवांवर अटॅक करू लागला आहे. जिल्ह्यात अशा रुग्णांचे प्रमाण वर्षागणिक वाढू लागले आहे. त्यामुळे स्थानिक आराेग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मागील चार वर्षांत जिल्ह्यात थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १ हजार ५३० असे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २०१७ मध्ये ३४९, २०१८ मध्ये ४३९, २०१९ मध्ये ४००, २०२० मध्ये २९२ तर चालू वर्षात म्हणजेच २०२१ मधील पाच रुग्णांचा समावेश आहे. फुप्फुसाव्यतिरिक्त अन्य अवयवांचा टीबी झालेल्या रुग्णांवर शासकीय यंत्रणेकडे औषधाेपचार आहेत; परंतु अशा रुग्णांचे निदान करण्यासाठीची सुविधा येथील शासकीय आराेग्य यंत्रणेकडे नाही. मेडिकल काॅलेज असल्यास अशा रुग्णांचे निदान हाेऊ शकते; परंतु आपल्याकडे मेडिकल काॅलेजही नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे रुग्ण थेट खाजगी दवाखाने गाठतात. या ठिकाणी निदान झाल्यानंतर तेथेच उपचारही केले जातात. त्यामुळे खाजगी दवाखान्यांच्या रिपाेर्टिंगवरच शासकीय यंत्रणेची भिस्त आहे. उपराेक्त अडचण लक्षात घेता, शासनाने अशा रुग्णांच्या निदानासाठी लागणारी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

चाैकट...

दृष्टिक्षेपात क्षयरुग्ण

वर्ष संख्या

२०१७ १६८६

२०१८ १९१४

२०१९ १८८५

२०२० १४४५

२०२१ ४११

(जानेवारी ते मे)

९३ जणांना टीबीसाेबतच ‘एचआयव्ही’

क्षयराेग विभागाने राबविलेल्या माेहिमेत २०२० मध्ये सुमारे ९३८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सुमारे ८८८ रुग्णांची ‘एचआयव्ही’ टेस्ट करण्यात आली. तपासणीअंती जवळपास ९३ जणांना ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे समाेर आले आहे. ही बाबही चिंताजनकच मानली जात आहे.

काेट...

मागील तीन वर्षांपर्यंत रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत हाेती; परंतु मध्यंतरी म्हणजेच काेराेनाच्या पहिल्या लाटेपूर्वी आपण डाेअर टू डाेअर जाऊन शाेधमाेहीम राबविली. या माध्यमातून सुमारे २ हजार ९४५ संशयित रुग्ण आढळून आले हाेते. स्फुटम तपासणी व एक्स-रे काढल्यानंतर ३९१ जणांना टीबी झाल्याचे समाेर आले. त्यामुळे चालू वर्षात फारसे रुग्ण आढळून आले नाहीत. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा सक्सेस रेटही जास्त आहे. काेराेनाच्या काळातही प्रत्येक रुग्णापर्यंत औषधे पाेहाेचविली आहेत. त्यामुळे सामन्य रुग्ण गंभीर झाल्याची एकही केस आपल्याकडे नाही.

-डाॅ. रफिक अन्सारी, जिल्हा क्षयराेग अधिकारी, उस्मानाबाद.