शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीसाठी प्रयत्नशील - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील ...

उस्मानाबाद : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. केंद्र सरकारचे यासाठी सर्वतोपरी सहकार्य असून, स्वदेश दर्शन व प्रसाद योजनेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवून या भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

तालुक्यातील काजळा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यात प्रामुख्याने स्वामी रामानंद महाराज मठ येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्त निवास बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, गाव अंतर्गत सिमेंट, गावांतर्गत बंदिस्त नाली बांधकाम, आदी विकासकामांचा समावेश आहे.

गावातील युवकांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु याची आपल्याला माहिती नसते. गावातील होतकरू तरुणांनी पुढे येऊन या योजनांचा अभ्यास करावा व आपल्याला सोयीस्कर असलेला एखादा उद्योग उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी आवश्यक कर्ज मंजुरीचा प्रस्ताव संबंधित बँकेकडे पाठवावा, आपण त्यांना सहकार्य करण्यास सांगू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रामानंद महाराज तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर निकष पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा, आपण यासाठी प्रयत्नशील राहू असे आ. पाटील यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सभापती दत्ता देवळकर, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जि. प. सदस्य अभिमन्यू शितोळे, पं. स. सदस्य प्रदीप शिंदे, विष्णुदास आहेर, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच नाना मडके, देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रदीप शेळके, ओम मगर, विजय हाऊळ, विलास खोचरे, चंदू पवार, रामचंद्र कदम, बप्पा पवार, विनोद बाकले, अमर बाकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.