शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीसाठी प्रयत्नशील - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील ...

उस्मानाबाद : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. केंद्र सरकारचे यासाठी सर्वतोपरी सहकार्य असून, स्वदेश दर्शन व प्रसाद योजनेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवून या भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

तालुक्यातील काजळा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यात प्रामुख्याने स्वामी रामानंद महाराज मठ येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्त निवास बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, गाव अंतर्गत सिमेंट, गावांतर्गत बंदिस्त नाली बांधकाम, आदी विकासकामांचा समावेश आहे.

गावातील युवकांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु याची आपल्याला माहिती नसते. गावातील होतकरू तरुणांनी पुढे येऊन या योजनांचा अभ्यास करावा व आपल्याला सोयीस्कर असलेला एखादा उद्योग उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी आवश्यक कर्ज मंजुरीचा प्रस्ताव संबंधित बँकेकडे पाठवावा, आपण त्यांना सहकार्य करण्यास सांगू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रामानंद महाराज तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर निकष पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा, आपण यासाठी प्रयत्नशील राहू असे आ. पाटील यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सभापती दत्ता देवळकर, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जि. प. सदस्य अभिमन्यू शितोळे, पं. स. सदस्य प्रदीप शिंदे, विष्णुदास आहेर, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच नाना मडके, देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रदीप शेळके, ओम मगर, विजय हाऊळ, विलास खोचरे, चंदू पवार, रामचंद्र कदम, बप्पा पवार, विनोद बाकले, अमर बाकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.