शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

जिभेचे लाड थांबवा, मसालेदार पदार्थामुळे होऊ शकतो अल्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : धावपळीच्या युगात अनेक जण वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच काही जण जिभेचे चोचले पुरविण्याकरिता मसालेदार, तिखट ...

उस्मानाबाद : धावपळीच्या युगात अनेक जण वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच काही जण जिभेचे चोचले पुरविण्याकरिता मसालेदार, तिखट पदार्थ खात आहेत. या पदार्थ्यांमुळे पोटाच्या अल्सरचा धोका उद्भवत आहे. त्यामुळे नागरिकांनी तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत, असा तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक व्यक्ती वेळेवर जेवण करीत नाहीत. काही जण जिभेचा लाड पुरविण्याकरिता बाहेर हॉटेलातील चटपटीत व मसालेदार, तिखट पदार्थ खाण्यास पसंती देत आहेत. शिवाय, तळलेल्या पदार्थांकडे अनेकांचा कल वाढला आहे. या पदार्थांमुळे अनेकांना पोटाचा त्रास उद्भवत आहे. पोटाच्या अल्सरचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त तेलकट, मसालेदार व तिखट खाणे टाळावे, असे डॉक्टरांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे....

पोट दुखणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

वजनात अचानक घट होणे

उलट्यातून रक्त पडणे

मळमळ होणे

पोटात आग पडणे

उदास वाटणे

काय काळजी घेणार

चटपटीत व लज्जतदार पदार्थ खाण्याचा अनेकांना मोह आवरत नसतो. मात्र, अशा पदार्थांच्या खाण्यामुळे पोटाचे आजार वाढत आहेत.

तिखट, मसालेदार पदार्थांमुळे पोटाचा अल्सर वाढत आहे. ही समस्या सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये आढळून येत आहे. घाईगडबडीचे आयुष्य असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळून यतो.

आरोग्याच्या दृष्टीने तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळणे, व्यसनापासून दूर राहणे, जागरण टाळणे, ध्यानधारणा करण्याने या आजारावर नियंत्रण मिळता येणे शक्य असते.

सकस आहाराबरोबरच नियमित व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पौष्टिक आहाराच महत्त्वाचा

मसालेदार, तिखट पदार्थांमुळे पोटाच्या समस्या उद्भवत आहेत. अवेळी जेवण, व्यसनामुळे या आजाराचा त्रास होतो. हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी पौष्टिक आहार घेणे, ध्यानधारणा करणे, सोबतच सिगारेट, तंबाखूचे व्यसन सोडणे महत्त्वाचे आहे. ओ-पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळून येत आहे.

-डॉ. राज गलांडे, जनरल फिजिशिन

उपाशी राहणे, तिखट, मासलेदार पदार्थांचा अधिक प्रमाणात आहारात समावेश असणे यामुळे अल्सरचा त्रास जाणवू लागतो. आजार टाळण्याकरिता वेळेवर जेवणे, जागरण टाळणे महत्त्वाचे आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना अल्सरचा त्रास जाणवत असतो.

-डॉ. एन. बी. गोसावी, जनरल फिजिशिन