शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जाण्यास राज्यातील आघाडी सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

कळंब : राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान झाले आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यामुळे प्रतिनिधित्व ...

कळंब : राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान झाले आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यामुळे प्रतिनिधित्व करता येणार नाही. आघाडी सरकारच्या ओबीसी समाजावरील या अन्यायाचा कळंब तालुका भाजपच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आमच्या ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती; पण या आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणूनबुजून काढून घ्यायचे होते. त्यामुळेच त्यांनी कोर्टाला इंपेरिकल डाटा दिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले, असे या निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमूनसुद्धा कुठलीही कारवाई केली नाही. जोपर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यामार्फत भाजपने दिले. निवेदनावर भाजप तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, बाजार समिती सभापती रामहरी शिंदे, अरुण चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस, परशुराम देशमाने, तालुका उपाध्यक्ष बजरंग शिंदे, नारायण टेकाळे, जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष सतीश वैद्य, चिटणीस सावता माळी, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष छाया खराटे, हणुमंत जाधवर, सुधीर बिक्कड, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक नीलेश दिवाने, बालाजी मडके, आबासाहेब रणदिवे, प्रताप पाडेकर, सोमनाथ भोंडवे, नितीन चौधरी, आदींच्या स्वाक्षरी आहेत.