शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

सोयाबीनचा दर पाच हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

कळंब : इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न देणारे पीक ठरल्याने अलीकडे सोयाबीनचा पेरा वेगाने वाढलेल्या कळंब तालुक्यातील शेतकरी, दरात ...

कळंब : इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न देणारे पीक ठरल्याने अलीकडे सोयाबीनचा पेरा वेगाने वाढलेल्या कळंब तालुक्यातील शेतकरी, दरात झालेल्या कमालीच्या घसरणीमुळे मात्र हवालदिल बनला आहे. अवघ्या दहा दिवसात दहा हजारावरून दराची पाच हजारावर घसरण झाली आहे.

कळंब तालुक्यात मागच्या दशकभरात पीक पद्धतीत अमूलाग्र बदल घडून आले आहेत. तूर, उडीद, मूग व कापूस या पिकांचा वरचष्मा मोडीत काढत एकूण पेरा झालेल्या क्षेत्रापैकी ऐंशी टक्के क्षेत्रावर एकट्या सोयाबीनचा बोलबाला निर्माण झाला आहे. इतर पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक उत्पन्न देत असल्याने या पिकाच्या क्षेत्रातही वाढ नोंदली जात होती. यंदाही गतवर्षीच्या तुलनेत पाच हजार हेक्टरने वाढ होत तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र साठ हजार हेक्टर झाले. पेरणी केल्यानंतर पहिला महिना पाऊसपाण्याच्या संदर्भात सुलभ गेला असला तरी, पुढे तब्बल २५ दिवस पावसाने ओढ दिल्याने हा खंड एकरी उत्पादनाला मारक ठरला होता.

उत्पादनात घट दृष्टिपथात दिसत असली तरी, बाजारात दरवृद्धीमुळे सोयाबीनचा ‘रूबाब’ होता. यामुळे उतार घटला तरी, दसहजारी ठरलेल्या सोयाबीनमुळे मालामाल होऊ असा शेतकऱ्यांचा आशावाद होता. परंतु, मागच्या दहा दिवसात हा दर पाच हजारावर आल्याने शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. आजच्या घडीला वाढलेला उत्पादन खर्च, काढणी व मळणीचा वाढता हिशेब गृहीत धरता, हा हंगाम मोठे आर्थिक नुकसान करणारा ठरत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

सोयाबीनचे दर...

महिना आवक (क्विंटल) दर (प्रतिक्विंटल )

जानेवारी २०२० ११९४७ ३९५०

जून २०२० ६१७२ ३८००

ऑक्टोबर २०२० ४७२०६ ३८००

जानेवारी २०२१ १०७१० ४३५०

जून २०२१ ११४१ ७३१०

सप्टेंबर २०२१ १३३७ ८०५०

सोयाबीनचा पेरा...

साल हेक्टर

२०१८ ५२०००

२०१९ ६३०००

२०२० ६५०००

२०२१ ६००००

प्रतिक्रिया...

यंदा मोठ्या संकटाने थोडेबहुत पीक हाती आले आहे. यास फडात उभे असताना आठ-नऊ हजाराचा दर होता. आता काढणी करावयाची आहे, तर दर अर्ध्यावर आला आहे. आजच्या भावात याचे विसेक हजारही येणार नाहीत. हा मोठा फटका आहे.

- बब्रुवान गोरे, शेतकरी, मस्सा (खं)

सध्या सोयाबीन पाच हजाराच्या आसपास आहे. यास काढावयास साडेचार हजार रुपये लागत आहेत. मळणीही महागली आहे. दर वाढला म्हणून मजूर जादा पैसै घेत आहेत. असे असताना सोयाबीन तर बेभाव विकले जात आहे. प्रत्येक शेतकरी यात खपला जात आहे. यामुळे भाववाढ झाली पाहिजे.

- राजाभाऊ गंभिरे, ईटकूर

बाजारभावाची चढ-उतार सामान्य व्यापाऱ्यांच्या आकलनाबाहेरची आहे. भाव का कोसळत आहेत, हे आम्हाला समजत नाही. आता पाहा, लातूर मिलच्या सकाळ अन् दुपारच्या भावात सहाशेची घट झाली आहे. काही तासाला असे घडत असेल, तर दूरचे काय सांगावे?

- लक्ष्मण कोल्हे, व्यापारी, कळंब