शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

१९ हजार हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

तुळजापूर तालुक्यातील काटी कृषी मंडळांतर्गत २२ गावात २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा केला. पेरणीनंतर ऐन शेंगा लगडण्याच्या ...

तुळजापूर तालुक्यातील काटी कृषी मंडळांतर्गत २२ गावात २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा केला. पेरणीनंतर ऐन शेंगा लगडण्याच्या वेळी पावसाने दीड महिन्याची ओढ दिली. त्यामुळे उत्पादनात घट येणार व नुकसान गृहीत घरून कृषी विभागाने विमा प्रतिनिधींसह पंचनामे केले, परंतु त्याची मदत अद्याप मिळाली नाही. यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने चार-चार शेंगा लागल्या. ते सोयाबीन आता कापणीला आले असतानाच गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊन सोयाबीन पिकात पाणी साचले. त्यामुळे कापणीला आलेले पीक पदरात पडेल, याची शाश्वती राहिली नाही.

चौकट

मजुरीचा दर वाढला

सोयाबीन कापणीचा हंगाम चालू होण्याच्या मार्गावर असतानाच पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. एक बॅग सोयाबीन कापणीला साडेचार ते पाच हजार रुपये दर मजुराकडून आकारला जात आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा मजुरीचा दर अधिक झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे

विमा कंपन्यांकडे तक्रारी नोंदवा

सोयाबीन पिकात पावसाचे पाणी साचून नुकसान होते. कापणीला आलेले पीक पाण्यात जास्त दिवस तग धरू शकत नाही. त्यामुळे नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन काटीचे मंडळ कृषी अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.

कोट......

सन २०२० मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत तुळजापूर तालुक्यात सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेले. त्या पिकाची नुकसानभरपाई वर्ष झाले तरी अद्याप मिळाली नाही. चालूवर्षीही पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीचा फटका सोयाबीन, उडीद पिकाला बसला. उत्पादनात सुमारे ५४ टक्के घट झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. आता उर्वरित पिकातही पावसाचे पाणी साठून ते कुजत आहे. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी.

- रामदास मगर, शेतकरी, सांगवी (काटी)