शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

सोयाबीनची मोंढ्यात ‘एन्ट्री’ होताच दर ‘पिछे मुड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

कळंब : एकीकडे सोयाबीनचं पीक फडात वाढत असतानाच दुसरीकडे मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरात दरदिवशी वाढ होत होती. मात्र, यामुळे शेतकऱ्यांत ...

कळंब : एकीकडे सोयाबीनचं पीक फडात वाढत असतानाच दुसरीकडे मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरात दरदिवशी वाढ होत होती. मात्र, यामुळे शेतकऱ्यांत निर्माण झालेला हर्षोल्हास क्षणिक ठरला असून, शेतात ‘खळं’ सुरू होताच बाजारात सोयाबीनच्या दरात कमालीची घट झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात तब्बल ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन या प्रमुख पिकाची पेर झाली होती. प्रामुख्याने जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या या क्षेत्रातील बहुतांश पीक आता नव्वद दिवसांच्या कालावधीचे झाल्याने पक्वतेच्या टप्प्यावर आहे. यामुळे हळूहळू काढणी हंगाम आकारास येत आहे. शेतातील उभे पीक आता हिरव्या रंगाची कात टाकून देत पिवळसर दिसत आहे. एकूणच काड वाळत असल्याने काढणीची लगबग सुरू आहे. काढणी उरकलेले मळणी करत आहेत, तर मळणी झालेल्यांचे माल मोंढ्यात दाखल होत आहेत. यास्थितीत लहरी निसर्गाच्या तडाख्यातून हाती आलेले पीक बाजारात दाखल होताच घसरलेल्या दराने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पेरणी झाल्यानंतर दराचा चढता आलेख राहिला होता. तो कायम राहील अन् यामुळे यंदा ‘मालामाल’ होऊ असा निर्माण झालेला आशावाद मात्र बाजारातील सध्याच्या घसरत्या दराने धुळीस मिळाला आहे.

चौकट...

आठ दिवसांपासून लागली घरघर

मागच्या आठ दिवसांत सोयाबीनच्या नव्या पिकाची आवक सुरू झाली आहे. यादरम्यान सोयाबीन जवळपास साडेआठ हजारांच्या आसपास विकले जात होते. यातच आवक हळूहळू वेग घेत असताना दर मात्र वेगाने घसरत होता. यात दरदिवशी पाचशेच्या आसपास घट नोंदली जात होती. यात शुक्रवार ते सोमवारच्या दरम्यान तर दीड-दोन हजारांचा झपका बसला. सोमवारच्या दरम्यान तर चक्क सहा हजारांच्या आत सोयाबीन घेतले जात होते.

दराची ‘नवलाई’ फोल ठरली...

यंदा आवक सुरू होताच काही मोंढ्यात मुहूर्ताचे दर दहा हजारांच्या पुढे गेले होते. साधारणपणे मागच्या पंधरवड्यात मार्केट ट्रेंड पण तसेच राहिले होते. वाढलेल्या दराची ही ‘नवलाई’ मोठ्या चर्चेचा विषय झाला होता. काही मोंढ्यातील उच्चांकी दर चांगलाच ‘फॉरवर्ड’ होत होता. मात्र, हा दर सद्यस्थितीत शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत असल्याचे दिसून येत आहे. लोकमतने मागच्या आठवड्यातच ‘पिवळ्या सोन्यास झळाळी : पदरी पडेल की मृगजळ ठरेल‘ या आशयाचे दिलेले वृत्त वास्तवदर्शी ठरले असून, मालाची आवक सुरू होताच वेगाने झालेली घसरण शेतकऱ्यांना कोट्यवधींचा झपका देणारी ठरली आहे.