शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची मोंढ्यात ‘एन्ट्री’ होताच दर ‘पिछे मुड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

कळंब : एकीकडे सोयाबीनचं पीक फडात वाढत असतानाच दुसरीकडे मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरात दरदिवशी वाढ होत होती. मात्र, यामुळे शेतकऱ्यांत ...

कळंब : एकीकडे सोयाबीनचं पीक फडात वाढत असतानाच दुसरीकडे मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरात दरदिवशी वाढ होत होती. मात्र, यामुळे शेतकऱ्यांत निर्माण झालेला हर्षोल्हास क्षणिक ठरला असून, शेतात ‘खळं’ सुरू होताच बाजारात सोयाबीनच्या दरात कमालीची घट झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात तब्बल ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन या प्रमुख पिकाची पेर झाली होती. प्रामुख्याने जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या या क्षेत्रातील बहुतांश पीक आता नव्वद दिवसांच्या कालावधीचे झाल्याने पक्वतेच्या टप्प्यावर आहे. यामुळे हळूहळू काढणी हंगाम आकारास येत आहे. शेतातील उभे पीक आता हिरव्या रंगाची कात टाकून देत पिवळसर दिसत आहे. एकूणच काड वाळत असल्याने काढणीची लगबग सुरू आहे. काढणी उरकलेले मळणी करत आहेत, तर मळणी झालेल्यांचे माल मोंढ्यात दाखल होत आहेत. यास्थितीत लहरी निसर्गाच्या तडाख्यातून हाती आलेले पीक बाजारात दाखल होताच घसरलेल्या दराने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पेरणी झाल्यानंतर दराचा चढता आलेख राहिला होता. तो कायम राहील अन् यामुळे यंदा ‘मालामाल’ होऊ असा निर्माण झालेला आशावाद मात्र बाजारातील सध्याच्या घसरत्या दराने धुळीस मिळाला आहे.

चौकट...

आठ दिवसांपासून लागली घरघर

मागच्या आठ दिवसांत सोयाबीनच्या नव्या पिकाची आवक सुरू झाली आहे. यादरम्यान सोयाबीन जवळपास साडेआठ हजारांच्या आसपास विकले जात होते. यातच आवक हळूहळू वेग घेत असताना दर मात्र वेगाने घसरत होता. यात दरदिवशी पाचशेच्या आसपास घट नोंदली जात होती. यात शुक्रवार ते सोमवारच्या दरम्यान तर दीड-दोन हजारांचा झपका बसला. सोमवारच्या दरम्यान तर चक्क सहा हजारांच्या आत सोयाबीन घेतले जात होते.

दराची ‘नवलाई’ फोल ठरली...

यंदा आवक सुरू होताच काही मोंढ्यात मुहूर्ताचे दर दहा हजारांच्या पुढे गेले होते. साधारणपणे मागच्या पंधरवड्यात मार्केट ट्रेंड पण तसेच राहिले होते. वाढलेल्या दराची ही ‘नवलाई’ मोठ्या चर्चेचा विषय झाला होता. काही मोंढ्यातील उच्चांकी दर चांगलाच ‘फॉरवर्ड’ होत होता. मात्र, हा दर सद्यस्थितीत शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत असल्याचे दिसून येत आहे. लोकमतने मागच्या आठवड्यातच ‘पिवळ्या सोन्यास झळाळी : पदरी पडेल की मृगजळ ठरेल‘ या आशयाचे दिलेले वृत्त वास्तवदर्शी ठरले असून, मालाची आवक सुरू होताच वेगाने झालेली घसरण शेतकऱ्यांना कोट्यवधींचा झपका देणारी ठरली आहे.