शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-लातूरकरांनी वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : नववर्षाच्या सुरुवातीला अगदी कोरोनामुक्तीच्या जवळ पोहोचलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात ४ हजार ६९९ रुग्णांची भर पडली ...

उस्मानाबाद : नववर्षाच्या सुरुवातीला अगदी कोरोनामुक्तीच्या जवळ पोहोचलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात ४ हजार ६९९ रुग्णांची भर पडली आहे. यात मार्च महिन्यातच २ हजार ३९९ रुग्ण आढळून आले आहेत.आधीच कोरोनाचा संसर्ग असलेल्या नजीकच्या सोलापूर, लातूर,बीड जिल्ह्यातील नागरिकांची ये-जा झाल्याने हा परिणाम झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लातूर, सोलापूर, बीड हे जिल्हे उस्मानाबाद जिल्ह्यास लागून आहेत. या जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून रुग्णांची लक्षणीय वाढ होत आहे. या जिल्ह्यात दिवसाकाठी ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यात २०० ते २२५ रुग्णांची नोंद होत आहे. शिवाय, मुंबई, पुण्यातही दिवसाकाठी हजारो रुग्ण आढळून येत आहेत. या जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकाची संख्या हजारोंच्या घरात आहे.

पॉईंटर...

बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणीच नाही

जिल्ह्यात सोलापूर, लातूर, मुंबई,पुणे या जिल्ह्यातून दरदिवशी हजारो प्रवासी जिल्ह्यात दाखल होतात, परंतु जिल्ह्यातील कोणत्याच बसस्थानकावर या प्रवाशांची चाचणी करण्याची सुविधा दिसून येत नाही.

त्यामुळे प्रवास करून आलेले नागरिक थेट शहरात प्रवेश करतात. शिवाय जिल्ह्याच्या कोणत्याही सीमेवर कोरोना चाचणी केली जात नाही.

रेल्वेस्थानकावरही चाचणी केली जात नाही.रेल्वेतून उतरलेले प्रवासी थेट शहरात प्रवेश करताना आढळून येतात.

चौकटी...

एसटीमधून सर्वाधिक प्रवाशांचा प्रवास

उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आगारातील एकूण ४५० बसपैकी २५० च्या जवळपास बस धावत आहेत. यातून प्रतिदिन ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.यात सर्वाधिक सोलापूर, लातूर या मार्गावर बस धावत असल्याने या जिल्ह्यातून हजारो प्रवासी दाखल होत असतात.

१४ खासगी बसची वाहतूक

जिल्ह्यातील व लातूर, निलंगा येथील खासगी बस उस्मानाबाद शहरातून मुंबई, पुणे या मार्गावर धावत असतात. जिल्ह्यात या बसद्वारे ४०० ते ५०० प्रवासी दाखल होतात.

मुंबई,पुणे येथून रेल्वेने ये-जा

उस्मानाबाद येथील रेल्वे स्थानकावर सध्या मुंबई, पुणे येथूनच रेल्वे येत आहे. या रेल्वेतून प्रतिदिन २५० ते ३५० च्या जवळपास प्रवासी येत आहेत. या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नसल्याचे दिसून आले.