शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

सोलापूर-लातूरकरांनी वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : नववर्षाच्या सुरुवातीला अगदी कोरोनामुक्तीच्या जवळ पोहोचलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात ४ हजार ६९९ रुग्णांची भर पडली ...

उस्मानाबाद : नववर्षाच्या सुरुवातीला अगदी कोरोनामुक्तीच्या जवळ पोहोचलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात ४ हजार ६९९ रुग्णांची भर पडली आहे. यात मार्च महिन्यातच २ हजार ३९९ रुग्ण आढळून आले आहेत.आधीच कोरोनाचा संसर्ग असलेल्या नजीकच्या सोलापूर, लातूर,बीड जिल्ह्यातील नागरिकांची ये-जा झाल्याने हा परिणाम झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लातूर, सोलापूर, बीड हे जिल्हे उस्मानाबाद जिल्ह्यास लागून आहेत. या जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून रुग्णांची लक्षणीय वाढ होत आहे. या जिल्ह्यात दिवसाकाठी ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यात २०० ते २२५ रुग्णांची नोंद होत आहे. शिवाय, मुंबई, पुण्यातही दिवसाकाठी हजारो रुग्ण आढळून येत आहेत. या जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकाची संख्या हजारोंच्या घरात आहे.

पॉईंटर...

बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणीच नाही

जिल्ह्यात सोलापूर, लातूर, मुंबई,पुणे या जिल्ह्यातून दरदिवशी हजारो प्रवासी जिल्ह्यात दाखल होतात, परंतु जिल्ह्यातील कोणत्याच बसस्थानकावर या प्रवाशांची चाचणी करण्याची सुविधा दिसून येत नाही.

त्यामुळे प्रवास करून आलेले नागरिक थेट शहरात प्रवेश करतात. शिवाय जिल्ह्याच्या कोणत्याही सीमेवर कोरोना चाचणी केली जात नाही.

रेल्वेस्थानकावरही चाचणी केली जात नाही.रेल्वेतून उतरलेले प्रवासी थेट शहरात प्रवेश करताना आढळून येतात.

चौकटी...

एसटीमधून सर्वाधिक प्रवाशांचा प्रवास

उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आगारातील एकूण ४५० बसपैकी २५० च्या जवळपास बस धावत आहेत. यातून प्रतिदिन ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.यात सर्वाधिक सोलापूर, लातूर या मार्गावर बस धावत असल्याने या जिल्ह्यातून हजारो प्रवासी दाखल होत असतात.

१४ खासगी बसची वाहतूक

जिल्ह्यातील व लातूर, निलंगा येथील खासगी बस उस्मानाबाद शहरातून मुंबई, पुणे या मार्गावर धावत असतात. जिल्ह्यात या बसद्वारे ४०० ते ५०० प्रवासी दाखल होतात.

मुंबई,पुणे येथून रेल्वेने ये-जा

उस्मानाबाद येथील रेल्वे स्थानकावर सध्या मुंबई, पुणे येथूनच रेल्वे येत आहे. या रेल्वेतून प्रतिदिन २५० ते ३५० च्या जवळपास प्रवासी येत आहेत. या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नसल्याचे दिसून आले.