शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

साहेब, कुटुंबाची जबाबदारी असल्याने आत्महत्या करणार नाही, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे नगदीकाठच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पिकांची ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे नगदीकाठच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पिकांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री थेट बांधावर दाखल झाले. यावेळी सुशिक्षित बेराेजगार शेतकरी विनायक आखाडे यांनी ‘‘साहेब, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी संकटापुढे गुढगे टेकवून आत्महत्या करणार्यातील नाही. मात्र, शासनानेही काेल्हापूरच्या धर्तीवर भरीव मदत द्यावी’, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने केली.

उस्मानाबाद जिल्ह्याचे शेवटचे गाव असणारे पारगाव या,ठिकाणी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्याच बरोबर या ठिकाणाहून वाहणारी मांजरा नदीच्या उगमपट्ट्यातही मोठा पाऊस झाल्याने नदीला महापूर आलेला होता. त्यामुळे मांजरा नदिलगत असलेल्या शेतीतील पिकांचे अताेनात नुकसान झाले. दरम्यान, ही नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख शुक्रवारी दुपारी १२ वाजता थेट शेतात दाखल झाले. यावेळी उपस्थित शेतकरी विनायक कल्याण आखाडे यांनी आपली कैफियत मांडली. २०१६ मध्येही अशीच महापुराची परस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही नदीलगत असलेली पिके पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली होती. तत्कालीन सरकारने मदतीचे आश्वासन देत तोंडाला पाने पुसून फक्त एकरी ८०० रुपये दिले होते. यावेळीही भयानक परस्थिती आहे. मी स्वतः एम. ए. बीएड सेट उत्तीर्ण आहे. बेरोजगारीमुळे शेती करत आहे. मात्र निसर्ग साथ देत नाही आणि सरकार तोंडाला पाने पुसत आहे. यावेळी तरी कोल्हापूरच्या धर्तीवर हेकटरी २० हजार रुपये मदत द्यावी. कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने मी आत्महत्या तर करू शकत नाही. मात्र सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने त्यांनी केली. दरम्यान, पालकमंत्री गडाख म्हणाले, शासनाकडून अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. साेबतच नदी पात्राच्या खाेलीकरणाचे कामही हाती घेतले जाईल. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानी १०० रूपयांच्या बाॅण्डवर लिहून द्यावे. यानंतर लागलीच काम सुरू केले जाईल. शिवाय काेल्हापुरी बंधाराही दुरूस्त करू, अशी ग्वाही दिली. कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, गटविकास अधिकारी राजगुरू, जि. प.चे पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे, सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण, बाबा घोलप, विकास तळेकर, तात्यासाहेब बहिर, महेश आखाडे, श्रीनिवास उंदरे, बाबा हारे, तानाजी कोकाटे, बंडू मुळे, राष्ट्रवादीचे प्रकाश मोटे, समाधान मोटे, धनंजय मोटे, प्रकाश आखाडे आदींची उपस्थिती हाेती.

यांनी दिले निवेदन...

पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने रखडलेल्या कामांचे निवेदन उपसरपंच काॅ. पंकज चव्हाण यांनी दिले. तर मराठा महासंघाचे अध्यक्ष मुजमिल पठाण यांनीही निवेदन दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटलांनी काळजी करू नये...

राज्य सरकारच्या भवितव्याच्या अनुषंगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक वक्तव्य केले हाेते. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता, त्यांनी सरकारच्या स्थिरतेबाबत काळजी करू नये. त्यांनी कितीही स्वप्न पाहिले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार एकदिलाने काम करीत आहे.