शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण काळरात्र! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
2
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
5
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
6
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
7
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
8
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
9
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
10
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
11
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
13
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
14
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
15
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
16
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
17
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
18
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
19
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
20
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, कुटुंबाची जबाबदारी असल्याने आत्महत्या करणार नाही, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे नगदीकाठच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पिकांची ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे नगदीकाठच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पिकांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री थेट बांधावर दाखल झाले. यावेळी सुशिक्षित बेराेजगार शेतकरी विनायक आखाडे यांनी ‘‘साहेब, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी संकटापुढे गुढगे टेकवून आत्महत्या करणार्यातील नाही. मात्र, शासनानेही काेल्हापूरच्या धर्तीवर भरीव मदत द्यावी’, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने केली.

उस्मानाबाद जिल्ह्याचे शेवटचे गाव असणारे पारगाव या,ठिकाणी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्याच बरोबर या ठिकाणाहून वाहणारी मांजरा नदीच्या उगमपट्ट्यातही मोठा पाऊस झाल्याने नदीला महापूर आलेला होता. त्यामुळे मांजरा नदिलगत असलेल्या शेतीतील पिकांचे अताेनात नुकसान झाले. दरम्यान, ही नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख शुक्रवारी दुपारी १२ वाजता थेट शेतात दाखल झाले. यावेळी उपस्थित शेतकरी विनायक कल्याण आखाडे यांनी आपली कैफियत मांडली. २०१६ मध्येही अशीच महापुराची परस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही नदीलगत असलेली पिके पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली होती. तत्कालीन सरकारने मदतीचे आश्वासन देत तोंडाला पाने पुसून फक्त एकरी ८०० रुपये दिले होते. यावेळीही भयानक परस्थिती आहे. मी स्वतः एम. ए. बीएड सेट उत्तीर्ण आहे. बेरोजगारीमुळे शेती करत आहे. मात्र निसर्ग साथ देत नाही आणि सरकार तोंडाला पाने पुसत आहे. यावेळी तरी कोल्हापूरच्या धर्तीवर हेकटरी २० हजार रुपये मदत द्यावी. कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने मी आत्महत्या तर करू शकत नाही. मात्र सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने त्यांनी केली. दरम्यान, पालकमंत्री गडाख म्हणाले, शासनाकडून अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. साेबतच नदी पात्राच्या खाेलीकरणाचे कामही हाती घेतले जाईल. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानी १०० रूपयांच्या बाॅण्डवर लिहून द्यावे. यानंतर लागलीच काम सुरू केले जाईल. शिवाय काेल्हापुरी बंधाराही दुरूस्त करू, अशी ग्वाही दिली. कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, गटविकास अधिकारी राजगुरू, जि. प.चे पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे, सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण, बाबा घोलप, विकास तळेकर, तात्यासाहेब बहिर, महेश आखाडे, श्रीनिवास उंदरे, बाबा हारे, तानाजी कोकाटे, बंडू मुळे, राष्ट्रवादीचे प्रकाश मोटे, समाधान मोटे, धनंजय मोटे, प्रकाश आखाडे आदींची उपस्थिती हाेती.

यांनी दिले निवेदन...

पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने रखडलेल्या कामांचे निवेदन उपसरपंच काॅ. पंकज चव्हाण यांनी दिले. तर मराठा महासंघाचे अध्यक्ष मुजमिल पठाण यांनीही निवेदन दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटलांनी काळजी करू नये...

राज्य सरकारच्या भवितव्याच्या अनुषंगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक वक्तव्य केले हाेते. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता, त्यांनी सरकारच्या स्थिरतेबाबत काळजी करू नये. त्यांनी कितीही स्वप्न पाहिले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार एकदिलाने काम करीत आहे.