शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! विहिरीची दरड कोसळून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; सहाजण बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 11:33 IST

या विहिरीत बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असल्याने गावातील तरुण व शाळकरी मुले येथे नियमित पोहण्यासाठी जात होते.

वाशी / पारगाव (जि. उस्मानाबाद) : विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन 12 वर्षीय शाळकरी मुलांचा दरड कोसळल्याने त्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना बनगरवाडी येथे आज सकाळी घडली आहे. सुदैवाने विहिरीत पोहण्यास उतरलेली जवळपास 5 ते 6 मुले मात्र यातून बचावली आहेत. 

वाशी तालुक्यातील बनगरवाडी गावालगतच काही शेतकऱ्यांची एक सामायिक विहीर आहे. या विहिरीत बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असल्याने गावातील तरुण व शाळकरी मुले येथे नियमित पोहण्यासाठी जात होते. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जवळपास 5 ते 6 जण या विहिरीत पोहण्यासाठी उतरले होते. दरम्यान, करण पिंटू बोडके व विवेक अश्रूबा लांडगे हे दोघेही विहिरीच्या दरडीवर बसून आनंद घेत होते. मात्र, अचानक ही दरड विहिरीत ढासळली. त्यामुळे त्यावर बसलेले उपरोक्त दोघेही दरडीतील दगडासह विहिरीतील पाण्यात कोसळले. त्यांच्यावर दगडांचा ढीग साचल्याने या दोघांचाही बुडून जागीच मृत्यू झाला.

 घटना समजताच गावातील नागरिक विहिरीच्या दिशेने धावले. तोपर्यंत वाशी ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख व तहसीलदार संदीप राजपुरेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने विहिरीतील पाणी मोटारीच्या साहाय्याने उपसून दगडाखाली दबलेल्या करण व विवेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर घटनास्थळी त्यांच्या पालकांनी व नागरिकांनीही मोठा आक्रोश केला होता.

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबादdrowningपाण्यात बुडणे