शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

कोणाचा काही नेम नाही; सॅनिटायझरचा वापर होतोय चूल पेटवण्यासाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:35 IST

ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरविले.

ठळक मुद्देसुरूवातीला हात निर्जंतूक करण्यासाठीच सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास गैरवापर

- बाबुराव चव्हाण 

उस्मानाबाद : लोक कोणत्या गोष्टीचा, कशासाठी वापर करतील याचा नेम नाही. कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवायचे असेल तर वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझर पुरविले; परंतु सध्या या सॅनिटायझरचा हात निर्जंतुक करण्यासाठी कमी अन् पावसाळ्याचे दिवस असल्याने चूल पेटविण्यासाठी अधिक उपयोग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुंबई, पुणे यासारख्या शहरातून कोरोना विषाणू ग्रामीण भागातही पोहोचला. त्यामुळेच बाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग यासह वेळोवेळी हात सॅनिटाईझ करण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकातही हात सॅनिटाईझ करण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरविले. सुरूवातीला हात निर्जंतूक करण्यासाठीच सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सकाळी पाणी तापवण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी चूल पेटविताना ग्रामीण भागातील गृहिणींच्या नाकीनऊ येते. पूर्वी रॉकेलच्या सहाय्याने चुली पेटविल्या जात; परंतु शहरांसोबतच ग्रामीण भागातही गॅस वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने रॉकेल मिळणे बंद झाले.

रॉकेलप्रमाणे सॅनिटायझरही पेट घेते, ही खबर एका गृहिणीकडून दुसऱ्या  गृहिणीकडे पोहोचली. अन् बघता-बघता सॅनिटायझरचा वापर हात निर्जंतूक करण्यासाठी कमी अन् चूल पेटविण्यासाठी अधिक सुरू झाला. हा प्रकार धोकादायक असून, वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकतो. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर वापराबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे आता सॅनिटायझर चूल पेटविण्यासाठी वापरणे धोकादायक आहे, हेही ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे झाले आहे.

खवाभट्टी चालकांकडून सॅनिटायझर संकलितभूम, वाशी आदी तालुक्यांत खवाभट्ट्यांची संख्या मोठी आहे. चुलीप्रमाणे खवाभट्ट्याही पावसाळ्यात लवकर पेट धरत नाहीत. सध्या रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे काही खवाभट्टी चालकांनी आपल्या संबंधातील लोकांकडून सॅनिटायझरच्या बाटल्या संकलित केल्या आहेत. हे सॅनिटायझर भट्टी पेटविण्यासाठी उपयोगात आणले जात  आहे. 

जीवावर बेतू शकते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय गरजेनुसारच सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी हात निर्जंतुक करण्यासाठीच त्याचा उपयोग करावा. चूल पेटविणे वा अन्य कारणांसाठी उपयोगात आणल्यास जिवावरही बेतू शकते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायतींनीही गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी.-डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याfireआग