शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कोणाचा काही नेम नाही; सॅनिटायझरचा वापर होतोय चूल पेटवण्यासाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:35 IST

ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरविले.

ठळक मुद्देसुरूवातीला हात निर्जंतूक करण्यासाठीच सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास गैरवापर

- बाबुराव चव्हाण 

उस्मानाबाद : लोक कोणत्या गोष्टीचा, कशासाठी वापर करतील याचा नेम नाही. कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवायचे असेल तर वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझर पुरविले; परंतु सध्या या सॅनिटायझरचा हात निर्जंतुक करण्यासाठी कमी अन् पावसाळ्याचे दिवस असल्याने चूल पेटविण्यासाठी अधिक उपयोग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुंबई, पुणे यासारख्या शहरातून कोरोना विषाणू ग्रामीण भागातही पोहोचला. त्यामुळेच बाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग यासह वेळोवेळी हात सॅनिटाईझ करण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकातही हात सॅनिटाईझ करण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरविले. सुरूवातीला हात निर्जंतूक करण्यासाठीच सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सकाळी पाणी तापवण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी चूल पेटविताना ग्रामीण भागातील गृहिणींच्या नाकीनऊ येते. पूर्वी रॉकेलच्या सहाय्याने चुली पेटविल्या जात; परंतु शहरांसोबतच ग्रामीण भागातही गॅस वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने रॉकेल मिळणे बंद झाले.

रॉकेलप्रमाणे सॅनिटायझरही पेट घेते, ही खबर एका गृहिणीकडून दुसऱ्या  गृहिणीकडे पोहोचली. अन् बघता-बघता सॅनिटायझरचा वापर हात निर्जंतूक करण्यासाठी कमी अन् चूल पेटविण्यासाठी अधिक सुरू झाला. हा प्रकार धोकादायक असून, वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकतो. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर वापराबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे आता सॅनिटायझर चूल पेटविण्यासाठी वापरणे धोकादायक आहे, हेही ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे झाले आहे.

खवाभट्टी चालकांकडून सॅनिटायझर संकलितभूम, वाशी आदी तालुक्यांत खवाभट्ट्यांची संख्या मोठी आहे. चुलीप्रमाणे खवाभट्ट्याही पावसाळ्यात लवकर पेट धरत नाहीत. सध्या रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे काही खवाभट्टी चालकांनी आपल्या संबंधातील लोकांकडून सॅनिटायझरच्या बाटल्या संकलित केल्या आहेत. हे सॅनिटायझर भट्टी पेटविण्यासाठी उपयोगात आणले जात  आहे. 

जीवावर बेतू शकते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय गरजेनुसारच सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी हात निर्जंतुक करण्यासाठीच त्याचा उपयोग करावा. चूल पेटविणे वा अन्य कारणांसाठी उपयोगात आणल्यास जिवावरही बेतू शकते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायतींनीही गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी.-डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याfireआग