शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

वंचित बहुजन आघाडीचा सेना-राष्ट्रवादीलाही धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:18 IST

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देऊन बहुजन समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे़ मागच्या लोकसभेला विखुरलेला हा समाज एकत्र आल्यास दोन्ही प्रमुख पक्षांना फटका बसणार आहे़

ठळक मुद्देदलित, मुस्लिम व ओबीसी मतांची मोट बांधण्याचा प्रयत्नअर्जुन सलगर हा नवा चेहरा समोर

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अर्जुन सलगर हा नवा चेहरा समोर आणला आहे़ दलित, मुस्लिम व ओबीसी मतांची मोट त्यांच्याकडून बांधण्यात येत आहे़ या मतदारसंघात जवळपास ३५ टक्के मतदान या समाजाचे असणार आहे़ 

मागच्या निवडणुकीत हे मतदान विखुरलेले होते़ त्यातही ओबीसी समाज प्रामुख्याने मोदी लाटेत शिवसेनेच्या पाठीशी राहिला होता़ काही प्रमाणात दलित समाजानेही सेनेच्या पाठीशी आपले बळ उभे केले होते़ मुस्लिम समाज मात्र बहुसंख्येने राष्ट्रवादीच्या मागे उभा होता़ येथे बसपाही दखलपात्र मते मिळविते़ मागच्या वेळी त्यांनी लाटेतही २८ हजारांहून जास्त मते मिळविली होती़ २००९ मध्येही तितकीच मते त्यांच्यासोबत होती़ वंचित आघाडीमुळे हे मतदान यावेळी फिरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

दरम्यान, एकीकडे वंचित आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसेल असे सांगितले जात असले तरी उस्मानाबादेत ही शक्यता फिफ्टी-फिफ्टी आहे़ त्यामुळे वंचित आघाडी ही निर्णायकच ठरणार असून, ज्या पक्षाची मते ती कमी घेईल, त्यांना येथे फायदा होणार असल्याचे दिसते़ मागच्या वेळेस युतीला मिळालेली ओबीसी व अन्य बहुजन मते या आघाडीकडे वळल्यास सेनेच्या उमेदवारास फटका बसणार आहे़ तसेच मुस्लिम व दलित मते वंचितकडे वळल्यास राष्ट्रवादीला फटका बसणार आहे़ 

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019