शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

जिल्ह्यातील सहा गावांची ‘ओडीएफ प्लस’साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा ...

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा वित्त आयाेग, राेहयाे, ग्रामपंचायत स्वनिधी तसेच इतर याेजनांच्या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

ग्रामीण भागातील १०० टक्के गावे २०१८-१९ मध्ये हागणदारीमुक्त म्हणून घाेषित करण्यात आली आहेत. २०२०-२१ पासून स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत आता या गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, उपलब्ध शौचालयाचा नियमित वापर, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व निर्मूलन करून गावातील उपलब्ध असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा सुयोग्य वापर व इतर आनुषंगिक कामे पूर्ण करून शाश्वत स्वच्छता कायम ठेवणाऱ्या गावांना ‘ओडीएफ प्लस’ गावे म्हणून घाेषित केले जाणार आहे. याकरिता प्रथम टप्प्यात तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद, भूम तालुक्यातील वांगी बु., उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी व वाशी तालुक्यातील सोनेगावची निवड करण्यात आली आहे. या गावात शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शौचालय सुविधा, आवश्यकतेप्रमाणे सार्वजनिक शौचालय सुविधा, वैयक्तिक शौचालयांचा १०० टक्के कुटुंबांकडून नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्तरांवरील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सवयी, गावातील दर्शनीय भिंतीवर स्वच्छतेचे संदेश व प्लास्टिक कचरा संकलन केंद्र या स्वच्छतेच्या शाश्वत सुविधा गावात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वी सदर गावांनी स्मार्ट ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा व विभागीय स्तरावर मानांकन मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी दिली आहे.

चाैकट...

गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह ओडीएफ प्लसचे सर्व निकष पूर्ण करून आलियाबाद, वांगी बु., बागलगाडी, गोपाळवाडी, पिंपळवाडी व सोनेगाव या ग्रामपंचायतींंप्रमाणे जिल्ह्यातील उर्वरित सर्व ग्रामपंचायतीने आपले गाव व जिल्हास ‘ओडीएफ प्लस’ मानांकनाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.

- अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.