शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यातील सहा गावांची ‘ओडीएफ प्लस’साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा ...

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा वित्त आयाेग, राेहयाे, ग्रामपंचायत स्वनिधी तसेच इतर याेजनांच्या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

ग्रामीण भागातील १०० टक्के गावे २०१८-१९ मध्ये हागणदारीमुक्त म्हणून घाेषित करण्यात आली आहेत. २०२०-२१ पासून स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत आता या गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, उपलब्ध शौचालयाचा नियमित वापर, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व निर्मूलन करून गावातील उपलब्ध असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा सुयोग्य वापर व इतर आनुषंगिक कामे पूर्ण करून शाश्वत स्वच्छता कायम ठेवणाऱ्या गावांना ‘ओडीएफ प्लस’ गावे म्हणून घाेषित केले जाणार आहे. याकरिता प्रथम टप्प्यात तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद, भूम तालुक्यातील वांगी बु., उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी व वाशी तालुक्यातील सोनेगावची निवड करण्यात आली आहे. या गावात शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शौचालय सुविधा, आवश्यकतेप्रमाणे सार्वजनिक शौचालय सुविधा, वैयक्तिक शौचालयांचा १०० टक्के कुटुंबांकडून नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्तरांवरील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सवयी, गावातील दर्शनीय भिंतीवर स्वच्छतेचे संदेश व प्लास्टिक कचरा संकलन केंद्र या स्वच्छतेच्या शाश्वत सुविधा गावात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वी सदर गावांनी स्मार्ट ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा व विभागीय स्तरावर मानांकन मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी दिली आहे.

चाैकट...

गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह ओडीएफ प्लसचे सर्व निकष पूर्ण करून आलियाबाद, वांगी बु., बागलगाडी, गोपाळवाडी, पिंपळवाडी व सोनेगाव या ग्रामपंचायतींंप्रमाणे जिल्ह्यातील उर्वरित सर्व ग्रामपंचायतीने आपले गाव व जिल्हास ‘ओडीएफ प्लस’ मानांकनाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.

- अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.