शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जिल्ह्यातील सहा गावांची ‘ओडीएफ प्लस’साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा ...

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा वित्त आयाेग, राेहयाे, ग्रामपंचायत स्वनिधी तसेच इतर याेजनांच्या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

ग्रामीण भागातील १०० टक्के गावे २०१८-१९ मध्ये हागणदारीमुक्त म्हणून घाेषित करण्यात आली आहेत. २०२०-२१ पासून स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत आता या गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, उपलब्ध शौचालयाचा नियमित वापर, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व निर्मूलन करून गावातील उपलब्ध असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा सुयोग्य वापर व इतर आनुषंगिक कामे पूर्ण करून शाश्वत स्वच्छता कायम ठेवणाऱ्या गावांना ‘ओडीएफ प्लस’ गावे म्हणून घाेषित केले जाणार आहे. याकरिता प्रथम टप्प्यात तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद, भूम तालुक्यातील वांगी बु., उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी व वाशी तालुक्यातील सोनेगावची निवड करण्यात आली आहे. या गावात शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शौचालय सुविधा, आवश्यकतेप्रमाणे सार्वजनिक शौचालय सुविधा, वैयक्तिक शौचालयांचा १०० टक्के कुटुंबांकडून नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्तरांवरील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सवयी, गावातील दर्शनीय भिंतीवर स्वच्छतेचे संदेश व प्लास्टिक कचरा संकलन केंद्र या स्वच्छतेच्या शाश्वत सुविधा गावात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वी सदर गावांनी स्मार्ट ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा व विभागीय स्तरावर मानांकन मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी दिली आहे.

चाैकट...

गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह ओडीएफ प्लसचे सर्व निकष पूर्ण करून आलियाबाद, वांगी बु., बागलगाडी, गोपाळवाडी, पिंपळवाडी व सोनेगाव या ग्रामपंचायतींंप्रमाणे जिल्ह्यातील उर्वरित सर्व ग्रामपंचायतीने आपले गाव व जिल्हास ‘ओडीएफ प्लस’ मानांकनाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.

- अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.