शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्यातील सहा गावांची ‘ओडीएफ प्लस’साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा ...

उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा वित्त आयाेग, राेहयाे, ग्रामपंचायत स्वनिधी तसेच इतर याेजनांच्या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

ग्रामीण भागातील १०० टक्के गावे २०१८-१९ मध्ये हागणदारीमुक्त म्हणून घाेषित करण्यात आली आहेत. २०२०-२१ पासून स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत आता या गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, उपलब्ध शौचालयाचा नियमित वापर, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व निर्मूलन करून गावातील उपलब्ध असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा सुयोग्य वापर व इतर आनुषंगिक कामे पूर्ण करून शाश्वत स्वच्छता कायम ठेवणाऱ्या गावांना ‘ओडीएफ प्लस’ गावे म्हणून घाेषित केले जाणार आहे. याकरिता प्रथम टप्प्यात तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद, भूम तालुक्यातील वांगी बु., उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी व वाशी तालुक्यातील सोनेगावची निवड करण्यात आली आहे. या गावात शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शौचालय सुविधा, आवश्यकतेप्रमाणे सार्वजनिक शौचालय सुविधा, वैयक्तिक शौचालयांचा १०० टक्के कुटुंबांकडून नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्तरांवरील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सवयी, गावातील दर्शनीय भिंतीवर स्वच्छतेचे संदेश व प्लास्टिक कचरा संकलन केंद्र या स्वच्छतेच्या शाश्वत सुविधा गावात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वी सदर गावांनी स्मार्ट ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा व विभागीय स्तरावर मानांकन मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी दिली आहे.

चाैकट...

गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह ओडीएफ प्लसचे सर्व निकष पूर्ण करून आलियाबाद, वांगी बु., बागलगाडी, गोपाळवाडी, पिंपळवाडी व सोनेगाव या ग्रामपंचायतींंप्रमाणे जिल्ह्यातील उर्वरित सर्व ग्रामपंचायतीने आपले गाव व जिल्हास ‘ओडीएफ प्लस’ मानांकनाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.

- अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.