शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बर्फगोळे विक्रीच्या पैशातून शाळेसाठी पाईपलाईन !

By admin | Updated: May 8, 2017 00:21 IST

उस्मानाबाद :विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती न पाहवल्याने गावातीलच बर्फगोळे विक्रेते नवनाथ बलभीम मिसाळ यांनी स्व:खर्चातून शाळेसाठी सुमारे एक किलोमिटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे.

बाबूराव चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : परंडा तालुक्यातील सिरसाव गावात जिल्हा परिषदेची दहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत चारशेवर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गावासह शिवारातील जलस्त्रोतांना खारट पाणी येत असल्याने या विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागत होते. घरून आणलेले पाणी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेलगतची घरे अथवा हॉटेलमध्ये जावून तहान भागवावी लागत असे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती न पाहवल्याने गावातीलच बर्फगोळे विक्रेते नवनाथ बलभीम मिसाळ यांनी स्व:खर्चातून शाळेसाठी सुमारे एक किलोमिटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे. मिसाळ यांच्या या दातृत्वामुळे आज सुमारे चारशेवर विद्यार्थ्यांची तहान भागली आहे.सिरसाव येथील साठ ते पासष्ठ वर्षीय नवनाथ मिसाळ यांची आर्थिकस्थिती बेताचीच. गावामध्ये केवळ दीड ते दोन एकर जमीन आहे. सततच्या नापिकीमुळे या जमिनीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. त्यामुळे मिसाळ यांनी गावामध्ये फिरून बर्फगोळे विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला. शेती आणि बर्फगोळे विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. बर्फगोळे विक्रीच्या निमित्ताने त्यांचा सातत्याने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वावर असतो. यामुळेच विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट त्यांच्या निर्दशनास येत असे. गावासह परिसरातील जलस्त्रोतांना खारट पाणी येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच बाटली भरून आणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सोबत आणलेले पाणी संपल्यानंतर मात्र, विद्यार्थ्यांना पाण्यासाठी शाळेलगत असलेली घरे आणि हॉटेलचा आधार घ्यावा लागत असे. अशावेळी मुलींची जास्त गैरसोय होत असे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी फरफट न पाहवल्यानेच ‘कुठल्याही परिस्थितीत शाळेसाठी पाईपलाईन करून द्यायचीच’, अशी खुनगाठ त्यांनी मनाशी बांधली. त्यानुसार बर्फगोळे विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही रक्कम ते पाईपलाईनच्या कामासाठी राखून ठेवू लागले. शेतीच्या उत्पन्नातील थोडीबहुत रक्कमही त्यांनी पाईपलाईनसाठी ठेवली. बघता-बघता ही रक्कम अर्ध्या लाखाच्या घरात पोहोंचली. या पैशातून पाईपलाईनचे काम होवू शकते, असा अंदाज आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. सिरसावसाठी तांदूळवाडी धरणातून पाणी योजना राबविण्यात आली आहे. ही योजना गावापासून किमान एक किलोमिटर अंतरावर आहे. या योजनेवरून कनेक्शन घेण्याचे निश्चित करून जवळपास अडीच इंच पाईपलाईन शाळेपर्यंत आणली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ना घरून पाणी आणावे लागतेय ना शाळा परिसरातील हॉटेल्सचा शोध घ्यावा लागतो. मिसाळ यांच्या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबण्यास मदत झाली आहे. या कार्यात त्यांना पंचायत समिती सदस्य पोपट चोबे, सरपंच संजय पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय चोबे, मुख्याध्यापक राजेंद्र मिसाळ, सहशिक्षक बालाजी पडवळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.