शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बर्फगोळे विक्रीच्या पैशातून शाळेसाठी पाईपलाईन !

By admin | Updated: May 8, 2017 00:21 IST

उस्मानाबाद :विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती न पाहवल्याने गावातीलच बर्फगोळे विक्रेते नवनाथ बलभीम मिसाळ यांनी स्व:खर्चातून शाळेसाठी सुमारे एक किलोमिटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे.

बाबूराव चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : परंडा तालुक्यातील सिरसाव गावात जिल्हा परिषदेची दहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत चारशेवर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गावासह शिवारातील जलस्त्रोतांना खारट पाणी येत असल्याने या विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागत होते. घरून आणलेले पाणी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेलगतची घरे अथवा हॉटेलमध्ये जावून तहान भागवावी लागत असे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती न पाहवल्याने गावातीलच बर्फगोळे विक्रेते नवनाथ बलभीम मिसाळ यांनी स्व:खर्चातून शाळेसाठी सुमारे एक किलोमिटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे. मिसाळ यांच्या या दातृत्वामुळे आज सुमारे चारशेवर विद्यार्थ्यांची तहान भागली आहे.सिरसाव येथील साठ ते पासष्ठ वर्षीय नवनाथ मिसाळ यांची आर्थिकस्थिती बेताचीच. गावामध्ये केवळ दीड ते दोन एकर जमीन आहे. सततच्या नापिकीमुळे या जमिनीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. त्यामुळे मिसाळ यांनी गावामध्ये फिरून बर्फगोळे विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला. शेती आणि बर्फगोळे विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. बर्फगोळे विक्रीच्या निमित्ताने त्यांचा सातत्याने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वावर असतो. यामुळेच विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट त्यांच्या निर्दशनास येत असे. गावासह परिसरातील जलस्त्रोतांना खारट पाणी येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच बाटली भरून आणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सोबत आणलेले पाणी संपल्यानंतर मात्र, विद्यार्थ्यांना पाण्यासाठी शाळेलगत असलेली घरे आणि हॉटेलचा आधार घ्यावा लागत असे. अशावेळी मुलींची जास्त गैरसोय होत असे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी फरफट न पाहवल्यानेच ‘कुठल्याही परिस्थितीत शाळेसाठी पाईपलाईन करून द्यायचीच’, अशी खुनगाठ त्यांनी मनाशी बांधली. त्यानुसार बर्फगोळे विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही रक्कम ते पाईपलाईनच्या कामासाठी राखून ठेवू लागले. शेतीच्या उत्पन्नातील थोडीबहुत रक्कमही त्यांनी पाईपलाईनसाठी ठेवली. बघता-बघता ही रक्कम अर्ध्या लाखाच्या घरात पोहोंचली. या पैशातून पाईपलाईनचे काम होवू शकते, असा अंदाज आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. सिरसावसाठी तांदूळवाडी धरणातून पाणी योजना राबविण्यात आली आहे. ही योजना गावापासून किमान एक किलोमिटर अंतरावर आहे. या योजनेवरून कनेक्शन घेण्याचे निश्चित करून जवळपास अडीच इंच पाईपलाईन शाळेपर्यंत आणली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ना घरून पाणी आणावे लागतेय ना शाळा परिसरातील हॉटेल्सचा शोध घ्यावा लागतो. मिसाळ यांच्या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबण्यास मदत झाली आहे. या कार्यात त्यांना पंचायत समिती सदस्य पोपट चोबे, सरपंच संजय पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय चोबे, मुख्याध्यापक राजेंद्र मिसाळ, सहशिक्षक बालाजी पडवळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.