शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

चार खुनात समान धागा, सूत्रधारांना व्हावी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : समाज सुधारणेच्या चळवळीत, कार्यात सक्रिय सहभागी असणाऱ्या विचारवंतांचे देशात खून होत आहेत. डॉ.दाभोलकर यांच्यासह इतरही तिघांचे गोळ्या ...

उस्मानाबाद : समाज सुधारणेच्या चळवळीत, कार्यात सक्रिय सहभागी असणाऱ्या विचारवंतांचे देशात खून होत आहेत. डॉ.दाभोलकर यांच्यासह इतरही तिघांचे गोळ्या झाडून खून झाले. या चारही खुनामध्ये एकसमान धागा दिसून येत आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. त्यामुळे विशेष पथकाद्वारे तपास होऊन सूत्रधारांना अटक व्हावी, अशी अपेक्षा शुक्रवारी अंनिसच्यावतीने व्यक्त करण्यात आली.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यापाठोपाठ कॉ.गोविंद पानसरे, माजी कुलगुरु एम.एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचेही गोळ्या झाडून खून झाले आहेत. समाज सुधारणेच्या कार्याला वाहून घेतलेल्या या विचारवंतांचा असा खून होणे, ही गंभीर बाब आहे. आज या घटनेला इतकी वर्षे उलटून गेली तरी सूत्रधारांचा पत्ता लागत नाही. गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करताना एसआयटीला चारही खुनामध्ये एकसमान धागा आढळून आला आहे. यामध्ये धार्मिक मूलतत्त्ववादी सहभागी आहेत, अशी दाट शंका आहे. त्यांना पकडण्यात उशीर होत आहे. तपासात निर्णायक गती यावी, यासाठी विशेष तपास पथक गठित करण्यात यावे, अशी मागणी अंनिसच्यावतीने करण्यात आली आहे. शिवाय, सामाजिक कार्यकर्त्यांचे खून थांबविण्यासाठी एका कडक कायद्याची तातडीने निर्मिती करण्यात यावी, चारही केसेसमध्ये निष्णात वकील नियुक्त करावेत, धार्मिक मूलतत्त्ववादी व्यक्ती, संघटनांवर बंदी घालावी, अशा मागण्याही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. यावेळी ॲड.वामन पांडगळे, ॲड.अजय वाघाळे, सिद्धेश्वर बेलुरे, अब्दुल लतीफ अब्दुल मजीद, विजय गायकवाड, शंकर खुने, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.