शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

‘झेडपी’तील दाेघांची बदली, दाेघांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील अनेक विभाग प्रमुखांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सरून गेला आहे. गतवर्षी काेराेनामुळे बदलीस पात्र अधिकाऱ्यांना मुदतवाढ ...

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील अनेक विभाग प्रमुखांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सरून गेला आहे. गतवर्षी काेराेनामुळे बदलीस पात्र अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यामुळे काहींचा कार्यकाळ तर चार ते पाच वर्षांचा झाला आहे. अशा अधिकाऱ्यांचे बदली आदेश धडकण्यास सुरूवात झाली आहे. साेमवार आणि मंगळवार या दाेन दिवसांत कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आले, तर सामान्य प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्या प्रमुखांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

मागील दाेन वर्षांपासून काेराेनाचे संकट पाठ साेडायला तयार नाही. मागील वर्षी ऐन बदल्यांच्या काळात काेराेना संसर्गाने प्रचंड गती घेतली हाेती. त्यामुळे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या जिल्हा परिषदेतील वर्ग-१च्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली हाेती. यंदाही बदल्या हाेतात की नाही, अशी चर्चा सुरू हाेत असतानाच साेमवारपासून पात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश येऊ लागले आहेत. साेमवारी जिल्हा कृषी विकास अधिकारी डाॅ. टी. जे. चिमनशेट्टे यांच्या बदलीचा आदेश धडकला. त्यांची नांदेड जिल्हा परिषदेत याच पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उपविभागीय कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नामदेव बाबुराव आघाव यांची गंगाखेड (जि. परभणी) येथे बदली झाली. त्यांच्या जागी रत्नागिरी येथील डाॅ. यतीन भैरवनाथ पुजारी यांची नियुक्ती झाली आहे. बदली व नियुक्तीचे हेे आदेश जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागास प्राप्त झाले आहेत.

चाैकट....

तुबाकले, निपाणीकर यांना मुदतवाढ

जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय तुबाकले, महिला व बालकल्याण अधिकारी बळीराम निपाणीकर हे दाेन्ही अधिकारी बदलीसाठी पात्र हाेते. परंतु, शासनाने यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आणखी वर्षभर याच जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

शिक्षणाधिकारी रूजू हाेणार कधी?

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला काही वर्षांनंतर राठाेड यांच्या रूपाने नियमित शिक्षणाधिकारी लाभले. त्यांचा आदेश सामान्य प्रशासन विभागाला काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाला आहे. हे पदही रिक्त आहे. मात्र, अद्याप ते रूजू झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी राठाेड रूजू हाेणार की नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.