शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'या' 5 कारणांमुळे खासदार रविंद्र गायकवाड लोकसभा उमेदवारीसाठी 'नापास' 

By महेश गलांडे | Published: March 22, 2019 5:12 PM

उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांना धक्का देत शिवसेनेने दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांचे सुपत्र ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबई - शिवसेनेन लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रा. रविंद गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास तब्बल 2 लाख 27 हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या रविंद्र गायकवाड यांचे तिकीट का कापले ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला असून याची कारणेही शोधली आहेत.

उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांना धक्का देत शिवसेनेने दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांचे सुपत्र ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ओमराजे यांची उमेदवारी जाहीर होताच, विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांच्या गटात नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र, शिवसेनेनं रविंद्र गायकवाड यांचे तिकीट का कापले याची काही प्रमुख कारणे आहेत. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांपैकी बार्शी हा महत्वाचा आणि निर्णायक मतदारसंघ मानला जातो. मात्र, या मतदारसंघातील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनीही जाहीर सभेत रविंद्र गायकवाड यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गायकवाड यांना तिकीट दिल्यास प्रचार करणार नसल्याचेही ते म्हणाले होते. तर, बार्शीकर जनतेतही विद्यमान खासदारांबाबत तीव्र नाराजी होती. केवळ मत मागायला येणारा खासदार म्हणून त्यांचा उल्लेख बार्शीमध्ये होत. त्यामुळे बार्शीकर मतदारांचा विचार 'मातोश्री'वर तिकीट फायनल करताना करण्यात आला आहे.  

रविंद्र गायकवाड हे वादग्रस्त खासदार म्हणून माध्यमात चर्चेत राहिले आहेत. रविंद्र गायकवाड यांनी रमजान महिन्यात रोजा सुरू असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये कर्मचाऱ्याच्या तोंडात जबरदस्तीने भाकरी कोंबली होती. महाराष्ट्र सदनच्या स्वयंपाकघरातील हा किस्सा देशातील आणि प्रामुख्याने राज्यातील माध्यमांमध्ये चांगलाच रंगला होता. तर, एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना रविंद्र गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्यास चपलेने मारले होते. त्यानंतर, गायकवाड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळेही वादग्रस्त खासदार म्हणून रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले होते. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 'नॉट रिचेबल खासदार' अशी प्रतिमा रविंद्र गायकवाड यांची बनली होती. एअर इंडियाच्या प्रकरणामुळे त्यांचा फोन त्या काळात नॉट रिचेबल असल्याचं सांगत होता. त्यामुळे मतदारसंघात सपर्क नसलेले नेते आणि नॉट रिचेबल खासदार अशी त्यांची ओळख बनली होती. शिवसेनेतील तानाजी सावंत यांच्या गटाने आणि प्रामुख्याने ओमराजे निंबाळकर यांच्याही गटाने रविंद्र गायकवाड यांची प्रतिमा 'नॉट रिचेबल खासदार' असल्याचं मोठ्या प्रमाणात भासवलं. याचाही परिमाण रविंद्र गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करताना झाला. 

मुंबईत गेल्या 15 दिवसांपासून शिवसेनेच्या तानाजी सावंत गटाने तळ ठोकला आहे. काहीही झाले तरी रविंद्र गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्याचा आग्रह या गटाने 'मातोश्री'वर केला आहे. त्यातच, तानाजी सावंत हे शिवसेना नेते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. मध्यतंरी, राजू शेट्टी यांच्यासोबतही वाद झाल्यानंतर मी शिवसेनेचा नेता आहे, असा दम तानाजी सावंत यांनी शेट्टींना भरला होता.  

खासदार रविंद्र गायकवाड यांनी आपला पूर्ण खासदारनिधी (25 कोटी रुपये) खर्च केला आहे. विशेष म्हणजे 15 व्या पंचवार्षिकमधील लोकसभेच्या उर्वरीत खासदाराचाही निधी त्यांनी विकासकामांसाठी खर्च केला आहे. मात्र, केंद्रात सत्ता असतानाही या खासदार निधीशिवाय एकही योजना किंवा विकासकामाचा प्रकल्प रविंद्र गायकवाड यांनी आणला नाही. त्यामुळेही मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर होता, असे लोकमतचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी चेतन धानुरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाRavindra Gaikwadरवींद्र गायकवाडMember of parliamentखासदार