शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

रेशनच्या धान्यालाही मिळतोय वाढीव दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST

उन्मेष पाटील कळंब : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने पोटाची आबाळ होऊ नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काही ...

उन्मेष पाटील

कळंब : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने पोटाची आबाळ होऊ नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काही घटकांना मोफत तर काही घटकांना अल्पदरात धान्य उपलब्ध करून दिले. या धान्याचाच आता काही मंडळी काळाबाजार करीत असल्याचे समोर आल्याने शासनाच्या उदात्त हेतूला धक्का पोहोचतो आहे.

कळंब तालुक्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत ३८ हजार लाभार्थी कुटुंबाना साडेआठ हजार क्विंटल धान्य दरमहा उपलब्ध होते. शेतकरी कुटुंबाना गहू २ रुपये किलो, तर तांदूळ तीन रुपये किलो दराने दिला जातो. अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना हे धान्य मोफत वितरित केले जाते. कोरोना काळात अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. कुटुंबाची उपासमार होत असल्याने शासनाने गरीबांनाही पोटभर अन्न मिळावे या हेतूने हे धान्य स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. मात्र, त्याचाच बाजार काही मंडळींनी मांडल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.

ग्रामीण भागात गहू व तांदूळ रोजच्या जेवणातील घटक नाहीत. ज्वारीची भाकरी हा आहाराचा भाग आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारा प्रती माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ हा काही कुटुंबात अतिरिक्त ठरतो आहे. बाजारात किमान अनुक्रमे २० रुपये व ४० रुपये दर असलेला गहू व तांदूळ त्यामुळेच आता काळ्या बाजारात मोस्ट वॉन्टेड ठरतो आहे. हा गहू -तांदूळ खरेदी करणाऱ्या टोळ्या आता गावोगावी जाऊन गहू ८ ते १०, तर तांदूळ १५ ते २० रुपये प्रतिकिलोने खरेदी करत आहेत. बिस्कीट, पाव, ब्रेड, खारी तसेच पापड्या वगैरे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या काही स्थानिक कंपन्या या गहू-तांदळाचे ठोक ग्राहक असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांत असे पदार्थ बनविणाऱ्या काही नव्या छोट्या कंपन्या मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने हा धान्याचा काळा बाजार सध्या तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे.

चौकट -

गावोगावी फिरतात वाहने

तालुक्यातील काही गावांतील लोकांकडे याबाबत चौकशी केली असता अशी वाहने महिन्यातून एकदा धान्य खरेदीसाठी येतात, अशी माहिती त्यांनी दिली. ज्यांच्या रेशनकार्डवर माणसे जास्त आहेत, पण ते रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, अशांना मिळणारे गहू-तांदूळ अतिरिक्त होतात. काहींच्या घरात एक कट्टा म्हणजे ५० किलो गहू-तांदूळ दोन महिन्यांला जमा होतात. त्याचे सरासरी हजार रुपये विनासायास मिळतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

चौकट -

तत्काळ माहिती देण्याचे निर्देश

शासकीय योजनेतील धान्य वापर न करता कोणी विकत असेल तर त्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही केली जाईल. हे धान्य विकत घेणारी मंडळी कोठे आढळून आली तर त्याबाबत पोलीस ठाणे तसेच तहसील प्रशासनाला त्वरित कळविण्याचे निर्देशही स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहेत. शासकीय धान्याचा कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकानदार, लाभार्थी किंवा अन्य यांनी गैरवापर केला तर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

- नरेंद्र काळे, प्रभारी नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, कळंब