शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

आवक वाढताच दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST

पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात खरीप हंगामातील सोयाबीनची आवक वाढली आहे. स्थानिक अडत दुकानांवर दररोज शेकडो क्विंटल सोयाबीन ...

पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात खरीप हंगामातील सोयाबीनची आवक वाढली आहे. स्थानिक अडत दुकानांवर दररोज शेकडो क्विंटल सोयाबीन विक्रीस येत आहे. परंतु, आवक वाढताच दरात दोन ते तीन हजारांची घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. चांगल्या सोयाबीनला पाथरुड येथील व्यापाऱ्यांकडून २० सप्टेंबर रोजी जास्तीत जास्त ६ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. दरम्यान, समाजमाध्यमांवर मात्र सोयाबीनला अकरा हजारांचा दर असल्याचे संदेश फिरत असल्याने शेतकऱ्यांत संभ्रमावस्था दिसून येत आहे.

पाथरुड परिसरात यावर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. सुरुवातीस वेळेवर पाऊस झाल्याने पीक बहरात आले. परंतु, त्यानंतर तब्बल २२ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने पिकाला मोठा फटका बसला. तरीही चांगले उत्पन्न हाती येत आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीस तयार झाले असून, हे नवीन सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येऊ लागले आहे. यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून समाजमाध्यमावर नवीन विक्रीस आलेल्या सोयाबीनला ११ हजार प्रती क्विंटल भाव मिळाल्याची चर्चा आहे. हा भावही खरा आहे. यामुळे शेतकरी आनंदीत आहेत. परंतु, हा भाव नवीन सोयाबीनचे उद्घाटन म्हणून प्रतीकात्मक एका शेतकऱ्याला दिलेला भाव आहे. प्रत्यक्षात नवीन सोयाबीनला चांगल्या मालास जास्तीत जास्त सहा हजार रुपये येथील व्यापाऱ्यांकडून भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

चौकट.........

दोन दिवसांत दोन हजारांनी दर घसरले

१७ सप्टेंबर रोजी विक्री केलेल्या सोयाबीनला ७ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. परंतु, त्यानंतर दोनच दिवसांनी विक्रीस आणलेले सोयाबीन ६ हजार ३०० रुपयांनी विक्री झाले. चर्चा मात्र ८ ते ११ हजार रुपये दराची होती. त्यामुळे नेमके खरे काय अन् खोटे काय, हे कळत नाही.

- बी. एन. वनवे, शेतकरी, आनंदवाडी

सोयाबीन दराबाबत शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता बाजाराचा संपूर्ण अभ्यास करूनच सोयाबीन विक्री करावे. सोयाबीनच्या दराबाबत वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करून विक्रीचा निर्णय घ्यावा. प्रमाणित बियाणे पेरणी केलेले सोयाबीन, सध्या काढलेले व न भिजलेले गुणवत्तापूर्ण असल्यास पुढील हंगामात पेरणीसाठी बियाणे म्हणून राखून ठेवावे.

- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी