शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सात हजारांवर शेती पंपांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

वाशी : थकीत वीज बिलासाठी महावितरणने १२० कोटी रुपये थकीत वीज बिलासाठी तालुक्यात जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. ...

वाशी : थकीत वीज बिलासाठी महावितरणने १२० कोटी रुपये थकीत वीज बिलासाठी तालुक्यात जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी तब्बल सात हजारांवर शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, याचा परिणाम शेतीपिकावर होत आहे. पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी काही काळ वीज सुरू केली जात असली तरी तीही सुरळीत मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाशी तालुक्यात वीज कंपनीचे पारडी, तेरखेडा, येसवंडी, पारगाव, वाशी, पारा, बावी व पिंपळगाव (लिंगी) अशी आठ ३३/११ ची उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. याअंतर्गत शेतीपंपाचे १० हजार १८० ग्राहक असून, या ग्राहकांकडे वीज बिलाची १२० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणचे उपविभागीय अभियंता रमेश शेंद्रे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यापूर्वी तीन उपकेंद्रांतील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करून शेतीपंपांचे वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या वेळी ३० लाखांच्या आसपास वसुली झाली होती. यानंतर पुन्हा २९ मार्च रोजी ५ उपकेंद्रांतून ७ हजार २४८ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करून वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अगोदरच मार्च २०२० पासून कोरोनाच्या महामारीमुळे देशासह राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतातील धानास भाव नाही, हाताला काम नाही. अशा परिस्थितीत वीज कंपनीने रब्बी हंगामातील पिके काढणीस आली असताना वीजपुरवठा खंडित करून कोंडित पकडलेले असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे आता वीजबिल कुठून भरावे? या विवंचनेत शेतकरी आहे़

चौकट.......

इतर अडचणींकडेही लक्ष देण्याची गरज

वीज कंपनीकडून अगोदरच शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा मिळत नाही. अनेक ठिकाणी डीपींची अवस्था दयनीय आहे. वीजवाहिन्या हाताला येतील अशा अंतरावर लोंबकळत असून, याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे थकीत बिलाची वसुली करतानाच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज भाई विनायक शेटे यांनी व्यक्त केली.

कोट......

वरिष्ठांच्या आदेशानुसार सध्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. पशुधनाची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये यासाठी दररोज एक तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपाची थकबाकी भरून वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे.

- रेणुका पत्की, अभियंता, वाशी