शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

उस्मानाबादेत ‘मुक्त वसाहत’ला पंचायत समित्यांची खिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 19:11 IST

 सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तब्बल तीनवेळा पत्र व्यवहार करूनही एकाही पंचायत समितीने ‘त्या’ पत्रांना दाद दिली नाही.

उस्मानाबाद : तांड्यांसह वस्त्यांवर वास्तव्य करणाऱ्यांना कुटुंबांना पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने यशवंतरााव चव्हाण मुक्त वसाहत योजना हाती घेतली आहे. सदरील योजनेच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समित्यांनी गावनिहाय बृहत आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. परंतु,  सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी तब्बल तीनवेळा पत्र व्यवहार करूनही एकाही पंचायत समितीने ‘त्या’ पत्रांना दाद दिलेली नाही, हे विशेष.

राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाच्या माध्यमातून पूर्वी वसंतराव नाईक तांडा-वस्ती सुधार योजना राबविण्यात येत होती. या योजनेच्या माध्यमातून पक्की घरे बांधून देण्यासोबत अन्य विकास कामेही केली जात होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने या योजनेमध्ये काही बदल करून नव्याने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना हाती घेतली. सदरील योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचला पाहिजे, यासाठी गावनिहाय बृहत आराखडे तयार करण्याचे आदेश शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला आदेश दिले होते.

आदेश येताच सहाय्यक आयुक्तांनी जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांना २४ जानेवारी २०१८ रोजी पत्र पाठवून गावनिहाय बृहत आराखडे तयार करून सादर करण्याबाबत निर्देशित केले होते. परंतु, सदरील पत्र पंचायत समित्यांनी फारशे गांभीर्याने घेतले नाही. परंतु, पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही एकाही पंचायत समितीने आराखडा तयार करून तो सामाजिक न्याय विभागाला सादर केला नाही. त्यामुळे त्यामुळे १ आॅगस्ट २०१८ रोजी सहाय्यक आयुक्तांनी पुन्हा पत्र पाठविले. याही पत्राला पंचायत समित्यांनी दाद दिली नाही.

काही दिवस वाट पाहून सहाय्यक आयुक्तांनी २८ आॅगस्ट रोजी पुन्हा तिसरे पत्र पाठविले आहे. हे पत्र पाठवूनही जवळपास महिनाभराचा कालावधी लोटत आला आहे. मात्र, यानंतरही पंचायत समित्यांनी उपरोक्त योजना फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. कारण अद्यापि एकाही पंचायत समितीने बृहत आराखडा सादर केलेला नाही. पंचायत समित्यांच्या या भूमिकेमुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेला अक्षरश: खिळ बसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.

लाभार्थी मारताहेत खेटे...तांडा सुधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. शासनाने या योजनेमध्ये बदल करून नव्याने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना हाती घेतली. परंतु, सदरील योजनेसाठी आवश्यक गावांचे बृहत आराखडेच अद्याप तयार नसल्याने गरज असतानाही लाभार्थ्यांना योजना देता येत नाही. परिणामी असे अनेक लाभार्थी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयाकडे खेटे मारीत आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाHomeसुंदर गृहनियोजनpanchayat samitiपंचायत समिती