शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी’त उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:40 IST

बीड, लातूर पिछाडीवर : शहरी तसेच ग्रामीण भागातही उपक्रमास गती

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबावणीचा अहवाल प्रतिदिन सरकारला सादर केला जात आहे. त्यानुसार या उक्रमात उस्मानाबादने लातूर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांना मागे टाकत राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. असे असतानाही दिवसागणिक रूग्णसंख्या वाढू लागली आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. ही परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांतही आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करीत आहेत. थोडीबहुत लक्षणे आढळून आली तरी संबंधितांना नजीकच्या रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. एखादा व्यक्ती कोरोना सदृश्य वा अन्य अजार अंगावर काढत असेल तर ते या माध्यमातून समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर तातडीने उपचारही करता येत आहेत. दरम्यान, उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रतिदिन करण्यात येत असलेल्या सर्व्हेचा अहवाल ऑनलाईन पद्धतीने शासनाला सादर केला जात आहे. त्यानुसार या उपक्रमामध्ये उस्मानाबादने राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. तर पहिल्या स्थानावर ठाणे जिल्हा आहे. उस्मानाबादला लागून असलेले सोलापूर, लातूर, बीडीसह अहमदनगर हे जिल्हे मात्र पिछाडीवर आहेत, हे विशेष.

२६ हजारावर कुटुंबांचा सर्व्हेमाझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने ६९१ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम घरोघरी जाऊन कुटुंबांची आरोग्य तपासणी करीत आहेत. २२ सप्टेंबर अखेर २६ हजार २१३ कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या कटुंबांतील १ लाख १३ हजार ३० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

मुख्य सचिवांकडून कौतुक‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाचा मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी ‘व्हीसी’द्वारे आढावा घेतला असता, राज्यात दुसºया क्रमांकावर असलेल्या उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनाने कौतुक केले. ही गती यापुढेही कायम ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केली.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात उस्मानाबाद राज्यात दुसºया स्थानी आहे. कुटुंब सर्व्हेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या टीम घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची अरोग्य तपासणी करीत आहेत. सर्वांच्या सहकार्याने ही गती यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.-अनिलकुमार नवाळे, सीईओ, जिल्हा परिषद.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या