शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी’त उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:40 IST

बीड, लातूर पिछाडीवर : शहरी तसेच ग्रामीण भागातही उपक्रमास गती

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबावणीचा अहवाल प्रतिदिन सरकारला सादर केला जात आहे. त्यानुसार या उक्रमात उस्मानाबादने लातूर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांना मागे टाकत राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. असे असतानाही दिवसागणिक रूग्णसंख्या वाढू लागली आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. ही परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांतही आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करीत आहेत. थोडीबहुत लक्षणे आढळून आली तरी संबंधितांना नजीकच्या रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. एखादा व्यक्ती कोरोना सदृश्य वा अन्य अजार अंगावर काढत असेल तर ते या माध्यमातून समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर तातडीने उपचारही करता येत आहेत. दरम्यान, उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रतिदिन करण्यात येत असलेल्या सर्व्हेचा अहवाल ऑनलाईन पद्धतीने शासनाला सादर केला जात आहे. त्यानुसार या उपक्रमामध्ये उस्मानाबादने राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. तर पहिल्या स्थानावर ठाणे जिल्हा आहे. उस्मानाबादला लागून असलेले सोलापूर, लातूर, बीडीसह अहमदनगर हे जिल्हे मात्र पिछाडीवर आहेत, हे विशेष.

२६ हजारावर कुटुंबांचा सर्व्हेमाझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने ६९१ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम घरोघरी जाऊन कुटुंबांची आरोग्य तपासणी करीत आहेत. २२ सप्टेंबर अखेर २६ हजार २१३ कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या कटुंबांतील १ लाख १३ हजार ३० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

मुख्य सचिवांकडून कौतुक‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाचा मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी ‘व्हीसी’द्वारे आढावा घेतला असता, राज्यात दुसºया क्रमांकावर असलेल्या उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनाने कौतुक केले. ही गती यापुढेही कायम ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केली.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात उस्मानाबाद राज्यात दुसºया स्थानी आहे. कुटुंब सर्व्हेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या टीम घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची अरोग्य तपासणी करीत आहेत. सर्वांच्या सहकार्याने ही गती यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.-अनिलकुमार नवाळे, सीईओ, जिल्हा परिषद.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या