शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी’त उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:40 IST

बीड, लातूर पिछाडीवर : शहरी तसेच ग्रामीण भागातही उपक्रमास गती

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबावणीचा अहवाल प्रतिदिन सरकारला सादर केला जात आहे. त्यानुसार या उक्रमात उस्मानाबादने लातूर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांना मागे टाकत राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. असे असतानाही दिवसागणिक रूग्णसंख्या वाढू लागली आहे. यासोबतच मृत्यूचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. ही परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांतही आहे. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करीत आहेत. थोडीबहुत लक्षणे आढळून आली तरी संबंधितांना नजीकच्या रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. एखादा व्यक्ती कोरोना सदृश्य वा अन्य अजार अंगावर काढत असेल तर ते या माध्यमातून समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर तातडीने उपचारही करता येत आहेत. दरम्यान, उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रतिदिन करण्यात येत असलेल्या सर्व्हेचा अहवाल ऑनलाईन पद्धतीने शासनाला सादर केला जात आहे. त्यानुसार या उपक्रमामध्ये उस्मानाबादने राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. तर पहिल्या स्थानावर ठाणे जिल्हा आहे. उस्मानाबादला लागून असलेले सोलापूर, लातूर, बीडीसह अहमदनगर हे जिल्हे मात्र पिछाडीवर आहेत, हे विशेष.

२६ हजारावर कुटुंबांचा सर्व्हेमाझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने ६९१ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम घरोघरी जाऊन कुटुंबांची आरोग्य तपासणी करीत आहेत. २२ सप्टेंबर अखेर २६ हजार २१३ कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या कटुंबांतील १ लाख १३ हजार ३० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

मुख्य सचिवांकडून कौतुक‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाचा मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी ‘व्हीसी’द्वारे आढावा घेतला असता, राज्यात दुसºया क्रमांकावर असलेल्या उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनाने कौतुक केले. ही गती यापुढेही कायम ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केली.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात उस्मानाबाद राज्यात दुसºया स्थानी आहे. कुटुंब सर्व्हेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या टीम घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची अरोग्य तपासणी करीत आहेत. सर्वांच्या सहकार्याने ही गती यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.-अनिलकुमार नवाळे, सीईओ, जिल्हा परिषद.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या