शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

ऊसणे सव्वाचार लाख रुपये तीस दिवसांत परत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

कळंब - हात ऊसणे पैसे वेळेत परत तर दिले नाहीतच, शिवाय दिलेला धनादेशही बँकेस वटवू न देणाऱ्या व्यक्तिला तालुका ...

कळंब - हात ऊसणे पैसे वेळेत परत तर दिले नाहीतच, शिवाय दिलेला धनादेशही बँकेस वटवू न देणाऱ्या व्यक्तिला तालुका न्यायालयाने एक महिन्याच्या आत रक्कम परत करावी, असे आदेशित करून तीस दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली असता तालुका न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आला आहे.

याबाबत कळंब येथील ॲड. डी. एस. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरभद्र भुजंगय्या स्वामी यांच्याकडून घरगुती कारणासाठी माणिक विठ्ठल कातमांडे (रा. पुनर्वसन सावरगाव, कळंब) यांनी २०११ मध्ये ४ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यातील २७ हजार रुपये ०२ ऑगस्ट २०१२ रोजी स्वामी यांना परत दिले होते. उर्वरित ४ लाख २८ हजार रुपये परत करण्यासाठी १३ ऑगस्ट २०१२ रोजी माणिक कातमांडे यांनी स्वामी यांना एका बँकेचा संयुक्त खात्याचा धनादेश दिला होता. यावर कातमांडे यांनी मात्र दिलेला चेक वटवण्यास हरकत घेतल्याने स्वामी यांना रक्कम मिळाली नाही. यानंतर वेळोवेळी पैशाची मागणी करूनही कातमांडे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने वीरभद्र स्वामी यांनी शेवटी तालुका न्यायालयात ॲड. एम. बी. देशमुख यांच्यामार्फत जानेवारी २०१६ रोजी माणिक कातमांडे विरुद्ध दावा दाखल केला होता. यावर न्यायालयात सुनावणी होवून दोन्ही बाजूचे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावे तपासून न्यायमूर्ती जी. व्ही. देशपांडे यांनी कातमांडे यांना तीस दिवसांच्या आत स्वामी यांना ४ लाख ३० हजार रुपये द्यावेत, त्याच बरोबर ३० दिवसाची साधी कैदेची शिक्षा सुनावली होती. या आदेशाला आव्हान देत जिल्हा न्यायालयात कातमांडे यांनी फौजदारी अपील केले होते. या अपिलावर जिल्हा व सत्र न्यायालय सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पटेकर यांनी तालुका न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. याबाबत फिर्यादी वीरभद्र स्वामी यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड. एम. बी. देशमुख यांनी कामकाज पाहिले.