शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबुल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
3
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
4
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
5
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
6
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
7
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
8
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
9
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
10
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
11
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
12
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
13
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
14
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
15
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
16
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
17
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
18
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
19
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
Daily Top 2Weekly Top 5

पारगावात पर्यायी स्मशानभूमीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे मांजरा नदीलगत असलेली स्मशानभूमी नदीला पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात एखाद्या ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे मांजरा नदीलगत असलेली स्मशानभूमी नदीला पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने येथे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

वाशी तालुक्यातील पारगाव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून, औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरा नदीच्या काठी वसलेले आहे. गावची लोकसंख्या जवळपास सहा हजार असून, ग्रामपंचायत सदस्य संख्या तेरा आहे. येथे एक सार्वजनिक स्मशानभूमी आहे. गावात कोणीही मयत झाल्यास याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र, ही जागा अपुरी असल्यामुळे एकाच दिवशी किंवा सलग दोन दिवशी दोन मृत्यू झाल्यास एका मृतदेहावर स्मशानभूमीच्या बाजूला मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे येथे आणखी एका स्मशानभूमीचे बांधकाम व्हावे, अशी ग्रामस्थांची जुनी मागणी आहे.

दरम्यान, सध्या उपलब्ध असलेली स्मशानभूमी मांजरा नदीकाठी असून, मांजरा नदीला पूर आल्यानंतर ती पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात अंत्यसंस्कारासाठी कुठलीच पर्यायी जागा उपलब्ध नाही. गावालगत शेतजमीन असलेले लोक त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड उभारून अंत्यसंस्कार करतात; परंतु ज्यांच्याकडे जागा नाही ते जुन्या डांबरी रस्त्यावरच मांजरा नदीवरील पुलाजवळ तर काही जण गावालगत असलेल्या फॉरेस्टमध्ये अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे येथे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

चौकट........

पूर परस्थितीदरम्यान अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. मात्र, ही समस्या आजवर कोणी मांडली नव्हती. या समस्येला प्राधान्य देत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांना विचारात घेऊन नवीन स्मशानभूमीसाठी प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल.

- महेश कोळी, सरपंच

सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात एकच स्मशानभूमी असल्याने आधीच अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. मांजरा नदीच्या काठावर असलेली स्मशानभूमी पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी अंत्यसंस्कार करताना मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे आता पुराचे पाणी येणार नाही, अशा ठिकाणी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी स्मशानभूमी होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पाठपुरावा करू.

- कॉ. पंकज चव्हाण, उपसरपंच