शहरं
Join us  
Trending Stories
1
धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी
2
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
3
ट्रम्प यांनी 'या' क्षेत्रावर लावलं ५०% टक्के टॅरिफ, भारताच्या या कंपन्यांवर होणार निर्णयाचा परिणाम
4
ऑपरेशन सिंदूर ऐन बहरात असताना अचानक युद्धविराम कसा काय झाला? CDS अनिल चौहान यांनी सांगितलं नेमकं कारण  
5
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
6
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती; थोडक्यात जाणून घ्या त्यांची आदर्श जीवनगाथा!
7
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
9
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
10
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
11
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
12
कॉलेजमधल्या प्रेयसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन; मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून
13
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
14
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
15
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
16
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
17
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
18
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
19
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
20
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा

३१ जिल्ह्यांमध्ये नवनिर्धार संवाद अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

तुळजापूर : दिनदलित, अंत्योदय व बहुजन समाज विकासापासून आजही वंचित आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या हक्काविषयी ...

तुळजापूर : दिनदलित, अंत्योदय व बहुजन समाज विकासापासून आजही वंचित आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या हक्काविषयी जनजागृती घडविण्यासाठी ३१ जिल्ह्यांमध्ये जनजागरणाचे सहा आठवड्याचे नवनिर्धार संवाद अभियान काढण्यात येत असल्याची माहिती माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी येथे दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे, अभिजित ढोबळे, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रा. ढोबळे म्हणाले, मागील ४० वर्षांत बहुजन रयत परिषद जनतेचे प्रबोधन करीत आहे. आतापर्यंत तीन यात्रा निघाल्या असून, ही चौथी प्रबोधन यात्रा आहे. वीर लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १८ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीमध्ये ३१ जिल्ह्यामध्ये नवनिर्धार संवाद अभियान यात्रा काढण्यात येत आहे. संवाद अभियानाचे तीन लाख पत्रक काढून त्यातील प्रत्येक जिल्ह्याला १० हजार पत्रक देण्यात येणार आहेत. या अभियाना दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच इतरही अनेक महत्त्वाच्या पदनियुक्त्या करण्यात येणार आहेत.

भविष्यात कायद्याच्या व शिक्षणाच्या चौकटीत राहून समाजाला नवी दिशा देण्याचे काम या नवनिर्धार संवाद अभियानामार्फत सुरू करीत आहोत. यात प्रामुख्याने बहुजन तरुण उच्चशिक्षित व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ज्या उत्साहात साजरे व्हायला हवे होते, तसे झाले नाही. म्हणूनच या महात्म्याची जयंती वेगळ्या दर्जाने साजरी करून त्यांना आदरांजली म्हणून अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीपासून ही संवादयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात आखण्यात आलेली आहे. बहुजनांच्या,कष्टकरी आणि होतकरू कामगारांच्या मुलांना शाळेत घालण्याचा निर्धार या निमित्ताने केला जाणार आहे. जयंतीला डॉल्बीवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा,बहुजनाच्या शिक्षणावर करणे हेच संघटनेचे उद्दिष्ट असेल, असेही ते म्हणाले.

चौकट.....

तीन झेंड्याच्या सरकारमुळे आरक्षण मिळाले नाही

आरक्षणाबाबतीत बोलताना म्हणाले १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यानंतर केलेल्या सर्वेक्षणात ६६ टक्के जमिनी मराठा समाजाच्या मालकीच्या होत्या. आता शंभर एकराचा मालक वाटणी होऊन अल्पभूधारक झाला. त्यामुळे शेती परवडेना झाली. ७० टक्के मराठा समाज रोजंदारीवर जाणारा आहे. त्यामुळे या समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे. दलितांमध्ये ५९ जाती आहेत. त्यातील फक्त पाच जातीच्या लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने सातवेळा मुदतवाढ मागितली; मात्र तीन झेंड्याचे सरकार असल्याने आरक्षण मिळू शकले नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओ.बी.सी. समाजाला सोबत नाही घेतले तर अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

290621\023020210629_172234.jpg

पत्रकार परिषदे मध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,प्रदेशाध्यक्ष कोमलताई साळुंखे,अभिजित ढोबळे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.