शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

चिखल, पाण्यातून शोधावी लागतेय शाळेची वाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

बसवराज होनाजे जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा ...

बसवराज होनाजे

जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत असून, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील भोसगा पाटीपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या धर्मवीर संभाजी विद्यालयात या शाळेसाठी भोसगा, दस्तापूर, कोळणूर पांढरी, तुगाव या चार गावांतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी पायी आणि सायकल घेऊन येत असतात. शाळेकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वनीकरणापासून आष्टाकासार गावाला जाणाऱ्या जुन्या रस्त्याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांसोबतच वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी तसेच शेतकरी शेतीकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात; परंतु, पावसाळ्यात महामार्गापासून तीनशे फूट अंतरावर मोठ्या प्रमाणावर पाणी थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेला जाण्यासाठी चिखल आणि घाण पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना तर शाळेपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर सायकली ठेवून पाण्यातून शाळा गाठावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने हा रस्ता होण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने हा त्रास कायमस्वरूपी सुरूच आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.

कोट......

संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या वतीने तहसीलदार आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निवेदन देऊन रस्ता तयार करण्यासाठी विनंती केली आहे. परंतु, आजपर्यंत तरी रस्ता झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- तानाजी साळुंके, मुख्याध्यापक, भोसगा

सर्वच ठिकाणी शाळा बंद असतानाही येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑफलाईन शाळा सुरू ठेवली आहे. परंतु, पावसामुळे विद्यार्थ्यांना चिखल, पाण्यातून जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.

- संजय मानाळे, पालक, भोसगा

अनेक वेळा मागणी करूनही संबंधित विभाग रस्ता करील का नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायतीनेच आपल्या स्तरावर रस्त्यावर मुरूम टाकून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- वैजीनाथ कागे, माजी उपसरपंच, भोसगा