शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
2
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
3
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
4
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
5
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
6
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
7
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
8
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
9
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
10
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
11
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
12
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
13
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
14
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
15
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
17
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
18
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
19
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
20
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
Daily Top 2Weekly Top 5

चिखल, पाण्यातून शोधावी लागतेय शाळेची वाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

बसवराज होनाजे जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा ...

बसवराज होनाजे

जेवळी : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत असून, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील भोसगा पाटीपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या धर्मवीर संभाजी विद्यालयात या शाळेसाठी भोसगा, दस्तापूर, कोळणूर पांढरी, तुगाव या चार गावांतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी पायी आणि सायकल घेऊन येत असतात. शाळेकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वनीकरणापासून आष्टाकासार गावाला जाणाऱ्या जुन्या रस्त्याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांसोबतच वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी तसेच शेतकरी शेतीकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात; परंतु, पावसाळ्यात महामार्गापासून तीनशे फूट अंतरावर मोठ्या प्रमाणावर पाणी थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेला जाण्यासाठी चिखल आणि घाण पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना तर शाळेपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर सायकली ठेवून पाण्यातून शाळा गाठावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने हा रस्ता होण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने हा त्रास कायमस्वरूपी सुरूच आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.

कोट......

संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या वतीने तहसीलदार आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निवेदन देऊन रस्ता तयार करण्यासाठी विनंती केली आहे. परंतु, आजपर्यंत तरी रस्ता झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- तानाजी साळुंके, मुख्याध्यापक, भोसगा

सर्वच ठिकाणी शाळा बंद असतानाही येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑफलाईन शाळा सुरू ठेवली आहे. परंतु, पावसामुळे विद्यार्थ्यांना चिखल, पाण्यातून जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.

- संजय मानाळे, पालक, भोसगा

अनेक वेळा मागणी करूनही संबंधित विभाग रस्ता करील का नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायतीनेच आपल्या स्तरावर रस्त्यावर मुरूम टाकून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- वैजीनाथ कागे, माजी उपसरपंच, भोसगा