शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री महोदय, इतके उस्मानाबादसाठी कराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प केवळ राज्य शासनाच्या पुढाकाराअभावी पुढे सरकत नसल्याचे सांगत तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प केवळ राज्य शासनाच्या पुढाकाराअभावी पुढे सरकत नसल्याचे सांगत तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ते मार्गी लावण्याचे साकडे घातले. जिल्ह्याच्या विकासकामांबाबत एक व्यापक बैठक घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले आहे. तीन आमदार, एक खासदार सेनेला दिले आहेत. ही बाब लक्षात घेता उस्मानाबादच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, असे आमदार पाटील यांना वाटते. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पाच प्रकल्पांचा उल्लेख केला आहे.

उस्मानाबादच्या कौडगाव एमआयडीसीत टेक्निकल टेक्सटाइल पार्क स्थापन करण्याबाबत प्राथमिक अहवाल तयार झाला आहे. तो राज्याने मंजूर करून केंद्राकडे पाठविणे गरजेचे आहे. हा प्रकल्प झाल्यास दहा हजार तरुणांना रोजगार मिळू शकते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के वाटा द्यावयाचा आहे. मात्र, अद्याप एक रुपयाही तरतूद न केल्याने हा प्रकल्प संथगतीने सरकत आहे. तुळजापूर शहराचा केंद्राच्या प्रशाद योजनेत समावेश करण्यासाठी पर्यटन खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. यात केवळ राज्याच्या प्राथमिक मागणी पत्राची गरज आहे. त्यास केंद्र १०० टक्के अनुदान देणार आहे. मात्र, याकडेही दुर्लक्ष आहे. वारंवार दुष्काळी स्थितीला सामोरे जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, त्याची निविदाप्रक्रिया थांबवून अन्याय केला जात आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. आपण स्वत: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणाला होतात. मात्र, आता त्यास वर्ष उलटत आले तरी अद्याप ८० टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घेतली जात नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रातून म्हटले आहे.