शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam : लॉकडाऊनमुळे गावी परतलेल्या विद्यार्थ्यांसमोर केंद्रावर जाण्याचा पेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:42 IST

परीक्षा केंद्र निवडलेल्या शहरांतील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, परीक्षेसाठी जायचे कसे, असा पेच विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहजारो एमपीएससीची विद्यार्थी चिंतेत परीक्षा सेंटर म्हणून जिल्ह्याचे ठिकाण द्यावे

- समिर सुतके

उमरगा (जि. उस्मानाबाद)  : सराकरी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई-पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेलेले शेकडो विद्यार्थी लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी परत आले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार? हे सांगणे कठीण आहे. असे असतानाच राज्यसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे यासारख्या महानगरातील परीक्षा केंद्र निवडली आहेत. परंतु, अशा शहरांतील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, परीक्षेसाठी जायचे कसे, असा पेच विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याचे ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

तालुक्यातील शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणी जातात. जिल्ह्यातून ही या महानगरांमध्ये  हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. तिथे महागडे क्लासेस लावून किरायाच्या खोल्याही घेतल्या. योग्यपद्धतीने अभ्यास सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आता तर संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरातील बहुतांशजण आता आपल्या मूळ गावी परतले आहेत. गावात येऊन त्यांनी आपला अभ्यास आॅनलाइन पद्धतीने सुरू ठेवला. अशातच राज्य लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होईल, असे जाहीर केले. पीएसआय, एसटीआय, एएसओ या परीक्षा ११ आॅक्टोबरला होणार आहेत. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. या सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसतात. 

यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई-पुण्यात या सारख्या महानगरातील परीक्षा केंद्र निवडली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ही मंडळी आता गावात आली. अनेकांनी आपल्या भाड्याच्या खोल्याही सोडल्या आहेत. अशा स्थितीत तालुक्यासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या शहरातील केंद्रावर जाणे कठीण झाले आहे. विशेषत: ग्रामीण गरीब होतकरू विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ही अडचण लक्षात घेता, मूळ गावी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणचे केंद्र निवडण्याची मूभा द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.  

जिल्ह्यानुसार केंद्र द्यावेमी दोन ते तीन वर्षापासून परीक्षेची तयारी पुण्यामध्ये करीत होतो. परंतु, कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मी गावी परतलो. लोकसेवा आयोगाची परीक्षा ही १३ सप्टेंबर रोजी सुधारित वेळापत्रकानुसार होत आहे. मात्र, माझे परीक्षा केंद्र पुण्यात आहे. सध्या हे शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. अशा शहरात जाऊन परीक्षा देणे कठीण आहे. त्यामुळे आमच्या जिल्ह्यानुसार केंद्र द्यावे. - हनुमंत सोलंकर,कोरेगाववाडी

पुण्यात परत जाऊन परीक्षा देणे कठीण१३ सप्टेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ११ आॅक्टोबर रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. मी दोन वर्षांपासून पुणे येथे परीक्षेची तयारी करीत आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आले आहे. आताच्या परिस्थितीत पुण्यात जाऊन परीक्षा देणे कठीण आहे. त्यामुळे आम्हाला लातूर वा उस्मानाबाद सेंटर द्यावे. - पूजा उदबळे, उमरगा

एमपीएससीशी पत्रव्यवहार करणारअनेक विद्यार्थी महानगरात कोचिंगसाठी गेले होते. परंतु आता ते परत आले आहेत. त्यांच्यापुढे परीक्षेला जाण्याचा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी आपण एमपीएससीशी पत्रव्यवहार करणार आहोत. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा.- डॉ.राम जाधव, संचालक, दिशा अकादमी, उमरगा

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाOsmanabadउस्मानाबादStudentविद्यार्थी